शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:57 IST

आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.

ठळक मुद्देबालमित्रांचाही सहभाग : शहर पोलिसांची उडाली भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.मेकोसाबाग, जरीपटक्यातील दोन १२ वर्षीय मुले आशू (नाव काल्पनिक, वय १४) याच्या घरी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आली. पांढऱ्या व्हॅन(कार)मध्ये आलेल्या काही जणांनी आशूला कारमध्ये कोंबले. आम्ही त्यांच्याकडे दगड भिरकावला म्हणून ते आशूलाच घेऊन पळून गेले, अशी माहिती त्यांनी आशूच्या आईवडिलांना दिली. मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने हादरलेल्या पालकांनी जरीपटका ठाणे गाठून तक्रार नोंदवली. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरभर मोठा पोलीस ताफा असताना एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रारवजा माहिती मिळाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. ठाणेदार पराग पोटे यांनी तातडीने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच आजूबाजूच्या पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी मुलांना घेऊन ते कथित घटनास्थळाकडे निघाले. तेथे हे दोघे वगळता कुणीच अशी घटना घडल्याबाबत दुजोरा देत नव्हते. त्यामुळे जरीपटकाच नव्हे तर अवघे शहर पोलीस दल कथित अपहरणकर्ते आणि पांढºया व्हॅनचा शोध घेण्यासाठी धावपळ करू लागले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे कळताच त्यांनीही जरीपटका पोलीस ठाणे गाठले. दुपारचे २ वाजले मात्र कथित अपहरणकर्ते आणि आशू सापडता सापडेना. आशूचे नातेवाईक, ही घटना सांगणारी ती दोन मुले, त्यांचे नातेवाईक आणि आजूबाजूची मंडळी या प्रकरणावर पोलीस ठाण्यात मंथन करीत असताना अचानक आशूच्या वडिलांना त्यांच्या भाच्याचा गोंदियाहून फोन आला. आशू माझ्यासोबत आहे. त्याला मी रेल्वेस्थानक गोंदिया येथे उतरवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘त्या दोघांना’ बोलते केले. पुढे आलेली माहिती पोलिसांसकट साºयांनाच चाट पाडणारी होती.निरागसता अन् गंभीरपणा चक्रावून टाकणाराआशूचे शाळा आणि अभ्यासात फारसे मन लागत नसल्यामुळे त्याच्या आईने शुक्रवारी त्याची खरडपट्टी काढली. आईकडून मार मिळाल्याने आशू कमालीचा अस्वस्थ झाला. रात्री झोपेतच त्याने स्वत:च्या कथित अपहरणाचा कट रचला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याने त्याच्या दोन बालमित्रांना या अपहरण नाट्यात सहभागी करून घेतले. तिघेही सायकलने रेल्वेस्थानकावर पोहचले.आशूने गोंदियाची रेल्वेगाडी पकडली तर, हे दोघे घराकडे परतले. आशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आशूच्या आईवडिलांना कथित अपहरणाची कथा सांगितली. पोलिसांनाही अपहरण नाट्य कसे घडले ते सांगत होते. पोलिसांशी बोलताना ते कधी घाबरल्यासारखे करीत होते. कधी गंभीरपणे तर कधी निरागसपणे पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. अडीच-तीन तास ते खोटे बोलत आहेत, असा साधा संशयही त्यांनी पोलिसांना येऊ दिला नाही.साऱ्यांचाच जीव पडला भांड्यातआशूच्या वडिलांना मात्र तो घरून पळून गोंदियाला गेला असावा, असा सुरुवातीपासूनच संशय होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वीच त्यांच्या गोंदियातील भाच्याला फोन करून रेल्वेस्थानकावर थांबायला सांगितले होते. त्यानुसार, भाचा रेल्वेस्थानकावर थांबला अन् आशू रेल्वेत दिसताच त्याने त्याला तेथे उतरवून घेत त्याच्या वडिलांना फोन केला. आशूने स्वत:च त्याच्या अपहरणाचे नाट्य रचले होते अन् त्यात त्याचे दोन बालमित्रही सहभागी होते, हे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण