शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:57 IST

आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.

ठळक मुद्देबालमित्रांचाही सहभाग : शहर पोलिसांची उडाली भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.मेकोसाबाग, जरीपटक्यातील दोन १२ वर्षीय मुले आशू (नाव काल्पनिक, वय १४) याच्या घरी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आली. पांढऱ्या व्हॅन(कार)मध्ये आलेल्या काही जणांनी आशूला कारमध्ये कोंबले. आम्ही त्यांच्याकडे दगड भिरकावला म्हणून ते आशूलाच घेऊन पळून गेले, अशी माहिती त्यांनी आशूच्या आईवडिलांना दिली. मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने हादरलेल्या पालकांनी जरीपटका ठाणे गाठून तक्रार नोंदवली. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरभर मोठा पोलीस ताफा असताना एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रारवजा माहिती मिळाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. ठाणेदार पराग पोटे यांनी तातडीने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच आजूबाजूच्या पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी मुलांना घेऊन ते कथित घटनास्थळाकडे निघाले. तेथे हे दोघे वगळता कुणीच अशी घटना घडल्याबाबत दुजोरा देत नव्हते. त्यामुळे जरीपटकाच नव्हे तर अवघे शहर पोलीस दल कथित अपहरणकर्ते आणि पांढºया व्हॅनचा शोध घेण्यासाठी धावपळ करू लागले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे कळताच त्यांनीही जरीपटका पोलीस ठाणे गाठले. दुपारचे २ वाजले मात्र कथित अपहरणकर्ते आणि आशू सापडता सापडेना. आशूचे नातेवाईक, ही घटना सांगणारी ती दोन मुले, त्यांचे नातेवाईक आणि आजूबाजूची मंडळी या प्रकरणावर पोलीस ठाण्यात मंथन करीत असताना अचानक आशूच्या वडिलांना त्यांच्या भाच्याचा गोंदियाहून फोन आला. आशू माझ्यासोबत आहे. त्याला मी रेल्वेस्थानक गोंदिया येथे उतरवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘त्या दोघांना’ बोलते केले. पुढे आलेली माहिती पोलिसांसकट साºयांनाच चाट पाडणारी होती.निरागसता अन् गंभीरपणा चक्रावून टाकणाराआशूचे शाळा आणि अभ्यासात फारसे मन लागत नसल्यामुळे त्याच्या आईने शुक्रवारी त्याची खरडपट्टी काढली. आईकडून मार मिळाल्याने आशू कमालीचा अस्वस्थ झाला. रात्री झोपेतच त्याने स्वत:च्या कथित अपहरणाचा कट रचला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याने त्याच्या दोन बालमित्रांना या अपहरण नाट्यात सहभागी करून घेतले. तिघेही सायकलने रेल्वेस्थानकावर पोहचले.आशूने गोंदियाची रेल्वेगाडी पकडली तर, हे दोघे घराकडे परतले. आशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आशूच्या आईवडिलांना कथित अपहरणाची कथा सांगितली. पोलिसांनाही अपहरण नाट्य कसे घडले ते सांगत होते. पोलिसांशी बोलताना ते कधी घाबरल्यासारखे करीत होते. कधी गंभीरपणे तर कधी निरागसपणे पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. अडीच-तीन तास ते खोटे बोलत आहेत, असा साधा संशयही त्यांनी पोलिसांना येऊ दिला नाही.साऱ्यांचाच जीव पडला भांड्यातआशूच्या वडिलांना मात्र तो घरून पळून गोंदियाला गेला असावा, असा सुरुवातीपासूनच संशय होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वीच त्यांच्या गोंदियातील भाच्याला फोन करून रेल्वेस्थानकावर थांबायला सांगितले होते. त्यानुसार, भाचा रेल्वेस्थानकावर थांबला अन् आशू रेल्वेत दिसताच त्याने त्याला तेथे उतरवून घेत त्याच्या वडिलांना फोन केला. आशूने स्वत:च त्याच्या अपहरणाचे नाट्य रचले होते अन् त्यात त्याचे दोन बालमित्रही सहभागी होते, हे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण