शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 19, 2024 21:15 IST

- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ

नागपूर: केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात गेल्यावर्षी कपात केली. ही कपात मार्च-२०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी १५ दिवसांपासून भडकले आहेत. सर्व खाद्यतेलात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे.होळी आणि रमजान महिन्यामुळे पाम तेलाचे दर मलेशिया देशातच महाग झाले आहेत. रमजान ईद साजरी होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाहीच. ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी होतील. पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम सर्व तेलाच्या दरवाढीवर झाल्याने लोकांना सध्यातरी जास्त दरातच खाद्यतेल खरेदी करावे लागेल, अशी शक्यता इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली. 

भारतात पाम तेलाची सर्वाधिक आयात होते. सध्या रमजान महिना असल्याने जगभरातील मुस्लीम देश मलेशियातून पाम तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे पाम तेलाचे दर जागतिक स्तरावर वधारले आहेत. या तेलामुळे अन्य खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून दरवाढ सुरू असून मार्च अखेरपर्यंत राहील. त्यानंतर अर्थात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मलेशियात दर कमी होताच भारतातही खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

आयात शुल्क कपातीचा तेलबियाच्या बाजारावर परिणामकेंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मार्च १५ रोजी अधिसूचना काढल्याने मार्च २०२५ पर्यंत कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफुल तेलावर ५.५० टक्के आणि रिफाईंड तेलावर १३.७५ टक्के आयातशुल्क राहणार आहे. मागील हंगामात याच पातळीवर आयातशुल्क होते. त्यामुळे विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. आयात वाढल्याचा दबाव देशातील तेलाच्या भावावर झाला. पुढे असेच निर्णय होत राहिल्यास देशातील शेतकरी तेलबिया उत्पादनापासून परावृत्त होऊ शकतात. ही देशासाठी चिंतेची बाब होऊ शकते, असे तेल बाजारातील अभ्यासकांचे मत आहे. भारतात पाम तेलाची आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून होते. सोयातेलाची आयात अर्जंेटिना आणि ब्राझीलमधून, सूर्यफुल तेल रशिया आणि युक्रेन देशातून होते.

खाद्यतेल सध्या १५ दिवसांआधीसोयाबीन ११५ १०५पाम ११५ १००राईस ११२ १००सूर्यफूल ११५ १०५शेंगदाणा १७६ १७२मोहरी १३० १२०जवस १२० १२०वनस्पती १३० ११५

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर