शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 19, 2024 21:15 IST

- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ

नागपूर: केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात गेल्यावर्षी कपात केली. ही कपात मार्च-२०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही देशात खाद्यतेलाचे दर कमी होण्याऐवजी १५ दिवसांपासून भडकले आहेत. सर्व खाद्यतेलात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील फोडणी महागली आहे.होळी आणि रमजान महिन्यामुळे पाम तेलाचे दर मलेशिया देशातच महाग झाले आहेत. रमजान ईद साजरी होईपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नाहीच. ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी होतील. पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम सर्व तेलाच्या दरवाढीवर झाल्याने लोकांना सध्यातरी जास्त दरातच खाद्यतेल खरेदी करावे लागेल, अशी शक्यता इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली. 

भारतात पाम तेलाची सर्वाधिक आयात होते. सध्या रमजान महिना असल्याने जगभरातील मुस्लीम देश मलेशियातून पाम तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. त्यामुळे पाम तेलाचे दर जागतिक स्तरावर वधारले आहेत. या तेलामुळे अन्य खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून दरवाढ सुरू असून मार्च अखेरपर्यंत राहील. त्यानंतर अर्थात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मलेशियात दर कमी होताच भारतातही खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

आयात शुल्क कपातीचा तेलबियाच्या बाजारावर परिणामकेंद्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मार्च १५ रोजी अधिसूचना काढल्याने मार्च २०२५ पर्यंत कच्चे सोयातेल, पामतेल आणि सूर्यफुल तेलावर ५.५० टक्के आणि रिफाईंड तेलावर १३.७५ टक्के आयातशुल्क राहणार आहे. मागील हंगामात याच पातळीवर आयातशुल्क होते. त्यामुळे विक्रमी १६५ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. आयात वाढल्याचा दबाव देशातील तेलाच्या भावावर झाला. पुढे असेच निर्णय होत राहिल्यास देशातील शेतकरी तेलबिया उत्पादनापासून परावृत्त होऊ शकतात. ही देशासाठी चिंतेची बाब होऊ शकते, असे तेल बाजारातील अभ्यासकांचे मत आहे. भारतात पाम तेलाची आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून होते. सोयातेलाची आयात अर्जंेटिना आणि ब्राझीलमधून, सूर्यफुल तेल रशिया आणि युक्रेन देशातून होते.

खाद्यतेल सध्या १५ दिवसांआधीसोयाबीन ११५ १०५पाम ११५ १००राईस ११२ १००सूर्यफूल ११५ १०५शेंगदाणा १७६ १७२मोहरी १३० १२०जवस १२० १२०वनस्पती १३० ११५

टॅग्स :Inflationमहागाईnagpurनागपूर