शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात ‘ईडी’ ने दाखल केला एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 07:00 IST

राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे.

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या सिंचन महाघोटाळ्यात ईडी (प्रवर्तन निदेशालय) ने एफआयआर दाखल केला आहे. नागपूर व अमरावती विभागात वेगवेगळा एफआयआर केला आहे. यात एसीबीच्या नागपूर व अमरावती विभागाने दाखल केलेल्या ४० प्रकरणांचा समावेश आहे. ईडीने अतिशय गोपनीयता बाळगली. कोरोनाचा प्रकोप संपताच ईडी सिंचन घोटाळ्याची मुळे पुन्हा खोदणार आहे. ईडीने एफआयआर केल्याने लोकमतने १५ जानेवारीला दिलेल्या वृत्ताची पुष्टी मिळाली आहे.सिंचन घोटाळ्यात राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची भूमिका राहिली आहे. २०१२ मध्ये एका जनहित याचिकेत ७० हजार कोटीचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा केला होता. तत्कालीन फडणवीस सरकारद्वारे न्यायालयात दिलेल्या आश्वासनानंतर एसीबीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविली होती. नागपूर व अमरावती एसीबीने एसआयटी गठित करून चौकशी केली होती. नागपूर एसीबीने २९ तर अमरावती एसीबीने १२ प्रकरणात गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात २०० कोटी रुपयांची हेराफेरी झाली होती. यात सिंचन विभागाचे अधिकारी, ठेकेदारासह १०० हून अधिक आरोपी होते. पण कुठल्याही आरोपींना अटक झाली नाही. न्यायालयात जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान एसीबीचे तत्कालीन डीजी संजय बर्वे यांनी २६ नोव्हेंबर २०१८ ला शपथपत्र सादर करून सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्याकडे बोट दाखविले होेते. त्यांना मंत्री असताना अधिकाऱ्यांद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांसदर्भात जबाबदार असल्याचा शपथपत्रात उल्लेख होता. विधानसभा निवडणुकीनंतर २३ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस सरकार अल्पकाळात सत्तेत आले. अजित पवार तीन दिवसांसाठी उपमुख्यमंत्री बनले. त्याचवेळी एसीबीने ९ प्रकरणांची चौकशी बंद करून अजित पवार घोटाळ्यात जबाबदार नाहीत, असे शपथपत्र न्यायालयात सादर केले होते. तीन दिवसानंतर २६ नोव्हेंबर २०१९ ला फडणवीस सरकार पडल्यानंतर २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचे गठण झाले, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत.१९ डिसेंबर २०१९ ला एसीबीचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंग यांनी न्यायालयात एसीबीद्वारे ९ प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आल्याच्या शपथपत्राला योग्य ठरविले. सिंह यांनी एक पाऊल पुढे टाकत पवार यांच्याविरुद्ध टीका करणाऱ्या तत्कालीन महासंचालक संजय बर्वे यांच्या भूमिकेवर नकारात्मक टिप्पणी केली होती. त्यानंतर एसीबीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सत्तेच्या खेळात एसीबीच्या भूमिकेमुळे दिल्लीतील राजकारण सक्रिय झाले होते. दिल्लीने ईडीला सक्रिय केले. तीन महिन्यापासून ईडी सिंचन घोटाळ्याचे विश्लेषण करीत होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत दोन एफआयआर दाखल केले. एकात नागपूर एसीबीचे २८ व दुसऱ्या एफआयआरमध्ये अमरावती एसीबीच्या १२ प्रकरणांचा समावेश होता. एसीबीचे वरिष्ठ अधिकारी तीन महिन्यापासून ईडीच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवून होते. ईडी द्वारे एफआयआर केल्याची माहिती मिळाल्यामुळे एसीबीमध्ये खळबळ उडाली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पदसूत्रांच्या नुसार ईडी या प्रकरणात पोलीस विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याबाबतीत संतप्त आहे. वरच्या पदावर जाण्यासाठी या अधिकाऱ्याने त्याला मिळालेल्या आदेशाचे डोळे मिटून पालन केले. त्याला ईडीद्वारे चौकशी सुरू करण्यात आल्याची भणक लागल्यामुळे तो सतर्क झाला होता. त्याने चौकशीत सहकार्य न करता, त्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा आधिकारी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या चौकशीशी जुळलेल्या एका प्रकरणात त्याची भूमिका संशयास्पद राहिली आहे. या प्रकरणाचीही सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती, परंतु ते प्रकरण नंतर दाबण्यात आले. ईडी या अधिकाऱ्याच्या भूमिकेचीही चौकशी करणार आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय