शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
2
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
3
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
4
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
5
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
6
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
7
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
8
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
9
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
10
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
11
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
12
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
13
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
14
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
15
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
16
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
17
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
18
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
19
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
20
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

दोनच वेळा खा, लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 09:52 IST

लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर कडक भूक लागण्याच्या दोन वेळाच जेवण करा असा अनोखा सल्ला ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त अभियानाचे’ प्रमुख व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लातूरच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.

ठळक मुद्देडॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा सल्ला ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवायचे असेल तर कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा आणि त्या दोन वेळानाच जेवण करा. आपले जेवण ५५ मिनिटात संपवा. दोन जेवणाच्या मध्ये काहीही खाऊ नका. जेवताना शक्यतो गोड कमी खा किंवा टाळा व जेवणातील प्रथिने वाढवा, असा अनोखा सल्ला ‘स्थुलत्व आणि मधुमेह मुक्त अभियानाचे’ प्रमुख व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लातूरच्या जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला.सप्तक प्रस्तुत व दालचिनी आणि पर्सिस्टंट यांच्या सहकार्याने रविवारी ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त अनुप कूमार, अभय जोशी, समीर बेंद्रे, विलास मानेकर व डॉ. जगन्नाथ दीक्षित उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, ‘दोन वेळा खा आणि वजन कमी करा’ या संकल्पनेवर सर्वप्रथम डॉ. श्रीकांत जिचकार यांनी १९९७ ते २००४ पर्यंत मोठी मोहीम राबवली होती. हा प्रयोग स्वत:वर केल्यामुळेच तीन महिन्यात माझे वजन आठ किलोंनी व पोटाचा घेर दोन इंचानी कमी झाला. ‘डाएट प्लॅनिंग’ द्वारे केला जाणारा हा फंडा मधुमेहाच्या रुग्णांसाठी मात्र नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत स्त्रियांच्या लठ्ठपणात जगात तिसराडॉ. दीक्षित म्हणाले, जगभरात लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या वेगाने वाढत आहे. जगात पुरुषांमध्ये लठ्ठपणात भारताचा पाचवा तर स्त्रियांबाबत तिसरा क्रमांक लागतो. देशात २० वर्षांपुढील व्यक्तीमध्ये मधुमेहाचे प्रमाण ८.७ टक्के आहे. यापैकी निम्म्या रुग्णांना मधुमेह असल्याचे माहिती नसल्याचे वास्तव आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदुतील रक्तस्राव व कर्करोग आदींचा धोका वाढतो. लठ्ठपणाला प्रतिबंध करता येतो. एकही पैसा खर्च न करता, डॉक्टरांकडे न जाता वजन कमी करता येऊ शकते. याच उपायने मधुमेहाचा प्रतिबंध देखील करू शकतो, असेही ते म्हणाले.डॉ. दीक्षित म्हणाले, रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढले की, शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. इन्सुलीनमुळे लठ्ठपणा येतो. शरीरात इन्सुलिन दोन प्रकारचे तयार होते. एक पायाभूत स्राव आणि दुसरे म्हणजे खाण्यामुळे होणारा स्राव. पायाभूत स्राव मध्ये १८ ते ३२ युनिट इन्सुलिन स्रवत असते. याला थांबवता येत नाही, मात्र खाण्यामुळे २८ ते ३२ युनिट स्रवणाऱ्या इन्सुलिनवर नियंत्रण आणता येते. कोणताही पदार्थ खाल्ला की शरीरात इन्सुलिन स्रवते. आहाराचे प्रमाण कितीही कमी जास्त असले तरी सारख्याच प्रमाणात इन्सुलिन स्रवते. विशेष म्हणजे, एकदा इन्सुलिन तयार झाल्यानंतर परत ५५ मिनिटे तयार होत नाही. म्हणूनच कोणत्याही दोन वेळा खाण्यासाठी पाळल्या तर त्या दोन वेळातच इन्सुलिन ‘सिक्रीट’ होऊ शकतो. रक्तातील इन्सुलिन लेव्हल कमी झाली की यकृतमधील ग्लायकोजनमधून ग्लुकोज रिलीज होत जाते. नंतर ‘फॅटी अ‍ॅसिड’ फॅट्सपासून निघते व त्यापासून ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने शरीरातील ‘फॅट्स’ नैसर्गिकपणे कमी होऊ लागतात व मनुष्याचे वजन आपोआप कमी होत जाते.

दोन जेवणाच्या मध्ये हे घ्याडॉ. दीक्षित म्हणाले, सर्वसाधारणपणे मनुष्याला भूक लागली, असे दोन वेळा होते. सकाळी ९ वाजता संध्याकाळी ६ वाजता किंवा दुपारी १२.३० वाजता आणि रात्री ८.३० वाजता अशा त्या वेळा असतात. आपण जर कटाक्षाने दोनच वेळा पाळल्या तर इन्सुलिन स्रवण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. या दोन जेवणाच्या मधे केवळ पाणी, पातळ ताक, बीन साखरेचा ग्रीन टी, ब्लॅक टी, नारळ पाणी, टोमॅटोच्या एक दोन फोडी खाता येईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्य