शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या खा, निरोगी राहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:10 IST

नागपूर : श्रावणात आता रानभाज्या उगवायला लागल्या आहेत. निसर्गाचा हा ठेवा लक्षात घेऊन आता जागृतीसाठी रानभाजी महोत्सवही व्हायला लागले ...

नागपूर : श्रावणात आता रानभाज्या उगवायला लागल्या आहेत. निसर्गाचा हा ठेवा लक्षात घेऊन आता जागृतीसाठी रानभाजी महोत्सवही व्हायला लागले आहेत. वर्षातून काही काळापुरत्याच उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निरोगी जीवनासाठी निसर्गाची भेटच आहे.

रानभाज्या या पूर्णत: नैसर्गिक आणि रसायनमुक्त असतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर खनिजे, जीवनसत्त्वे असतात. अनेक रोगांवर त्या गुणकारी असतात. पहिल्या पावसासोबत त्या ठराविक काळात उगवतात. श्रावण महिन्यापर्यंत वाढतात. पुढे हळूहळू उगवायच्या थांबतात.

नागपूर जिल्ह्यात साधारणत: उतरण, काटवल (कर्टुले), माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, तरोटा, केना, धानभाजी, टेकाडे, पकानवेल, भशेल पानवेल, बांबू वास्ते, भराटी, मटारू, रानमटारू, सुरण, रानकोचई, वाघोटी, दिंडा, वडवांगे, माठ, आघाडा, घोळ, चिवळ, धोपा, शेरेडिरे, खापरखुटी (पुनर्नवा) आदींसह ४० प्रकारच्या भाज्या आढळतात.

...

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

खापरखुटी (पुनर्नवा) - आयुर्वेदात पुनर्नवा असे नाव. शरीराला नवचैतन्य देते.

कुडा : या आयुर्वेदिक औषधात कुड्याच्या मुळावरील सालीचा वापर. पोटदुखी, हगवण यावर उपयोगी. याच्या बियांना इंद्रजव म्हणतात. कामशक्ती वाढविण्यासाठीच्या औषधात वापर.

कुरडू : तणभाजी असून, शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. दमा, श्वसनरोगात लाभदायक. श्रावणात सर्वांनी खावी.

आघाडा : तणभाजी असून, कडू व पाचक असते. उष्णता कमी करून लघवीतील आम्लता दूर करते.

चुक्का : उष्णतेचे विकार घालवून पचनक्रिया सुधारते. सूज उतरविते, रक्तदोष दूर करते.

केणा : त्वचाविकार घालविते, सूज उतरविते, पचनक्रिया सुधारून पोट साफ करते.

...

२) या रानभाज्या झाल्या गायब

सुरंग : हा जमिनीत वाढणारा कंद आहे. यात उत्तम प्रोटिन्स असून, शरीरातील निरुपयोगी आणि विषारी केमिकल्स घालविते.

मटारू : यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. वेलीवर फळे येतात. भाजी करून तसेच भाजूनही खाता येतात. महिलांच्या आजारात गुणकारी.

...

३) शक्तिवर्धक रानभाज्या (कोट)

सर्वच रानभाज्या दुर्मीळ आहेत. त्यात खनिजे भरपूर असल्याने आरोग्यदायी आहेत. अनेक भाज्यांबद्दल गैरसमजही आहेत. ते प्रबोधनातून दूर करण्याची गरज आहे.

-डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता, पं.कृ.वि. नागपूर

...