शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या खा, निरोगी राहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:10 IST

नागपूर : श्रावणात आता रानभाज्या उगवायला लागल्या आहेत. निसर्गाचा हा ठेवा लक्षात घेऊन आता जागृतीसाठी रानभाजी महोत्सवही व्हायला लागले ...

नागपूर : श्रावणात आता रानभाज्या उगवायला लागल्या आहेत. निसर्गाचा हा ठेवा लक्षात घेऊन आता जागृतीसाठी रानभाजी महोत्सवही व्हायला लागले आहेत. वर्षातून काही काळापुरत्याच उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निरोगी जीवनासाठी निसर्गाची भेटच आहे.

रानभाज्या या पूर्णत: नैसर्गिक आणि रसायनमुक्त असतात. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर खनिजे, जीवनसत्त्वे असतात. अनेक रोगांवर त्या गुणकारी असतात. पहिल्या पावसासोबत त्या ठराविक काळात उगवतात. श्रावण महिन्यापर्यंत वाढतात. पुढे हळूहळू उगवायच्या थांबतात.

नागपूर जिल्ह्यात साधारणत: उतरण, काटवल (कर्टुले), माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, तरोटा, केना, धानभाजी, टेकाडे, पकानवेल, भशेल पानवेल, बांबू वास्ते, भराटी, मटारू, रानमटारू, सुरण, रानकोचई, वाघोटी, दिंडा, वडवांगे, माठ, आघाडा, घोळ, चिवळ, धोपा, शेरेडिरे, खापरखुटी (पुनर्नवा) आदींसह ४० प्रकारच्या भाज्या आढळतात.

...

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

खापरखुटी (पुनर्नवा) - आयुर्वेदात पुनर्नवा असे नाव. शरीराला नवचैतन्य देते.

कुडा : या आयुर्वेदिक औषधात कुड्याच्या मुळावरील सालीचा वापर. पोटदुखी, हगवण यावर उपयोगी. याच्या बियांना इंद्रजव म्हणतात. कामशक्ती वाढविण्यासाठीच्या औषधात वापर.

कुरडू : तणभाजी असून, शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. दमा, श्वसनरोगात लाभदायक. श्रावणात सर्वांनी खावी.

आघाडा : तणभाजी असून, कडू व पाचक असते. उष्णता कमी करून लघवीतील आम्लता दूर करते.

चुक्का : उष्णतेचे विकार घालवून पचनक्रिया सुधारते. सूज उतरविते, रक्तदोष दूर करते.

केणा : त्वचाविकार घालविते, सूज उतरविते, पचनक्रिया सुधारून पोट साफ करते.

...

२) या रानभाज्या झाल्या गायब

सुरंग : हा जमिनीत वाढणारा कंद आहे. यात उत्तम प्रोटिन्स असून, शरीरातील निरुपयोगी आणि विषारी केमिकल्स घालविते.

मटारू : यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. वेलीवर फळे येतात. भाजी करून तसेच भाजूनही खाता येतात. महिलांच्या आजारात गुणकारी.

...

३) शक्तिवर्धक रानभाज्या (कोट)

सर्वच रानभाज्या दुर्मीळ आहेत. त्यात खनिजे भरपूर असल्याने आरोग्यदायी आहेत. अनेक भाज्यांबद्दल गैरसमजही आहेत. ते प्रबोधनातून दूर करण्याची गरज आहे.

-डॉ. देवानंद पंचभाई, सहयोगी अधिष्ठाता, पं.कृ.वि. नागपूर

...