शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 11:50 IST

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे

ठळक मुद्देपृथ्वीचे ट्रोपोस्फियर तापमानवाढ धोकादायक : भविष्यात उष्णलहरींचा धोका

नागपूर : एका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधनातून धोकादायक बाब पुढे आली आहे. प्रदूषण आणि हरित वायूंमुळे पृथ्वीचे ट्रोपोस्फियर (अंतरावरण) गरम झाले आहे. मागील ४० वर्षात या अंतरावरणाची उंची आणि सीमा २०० मीटरने वाढली आहे. परिणामत: भविष्यात अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होणार असून उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा यावर विपरित परिणाम होण्याचा इशारा या संशोधनातून देण्यात आला आहे.

नानजिंग विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संशोधक लिग्युन मेंग, तसेच कॅनडा, ऑस्ट्रिया येथील संशोधक जेन लिऊ, डेव्हिड तारासिक, विल्यम रेनेडेल, आद्रिया स्टेनर, हेलेंजर विल्हेम्सेन, ली वेंग यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. १९८० ते २०२० या ४० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात झालेल्या बदलांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. उत्तर गोलार्धातील भूप्रदेश आणि २० ते ८० अक्षांशावरील हवामान क्षेत्रावर हे अध्ययन करण्यात आले होते.

या संशोधकांच्या निरीक्षणानुसार, १९६० पूर्वी पृथ्वीचे आवरण स्थिर होते. पृथ्वीवर मानवनिर्मित हरितवायू तयार होत गेले. ते थरात साचले. यामुळे पृथ्वीच्या ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेले. २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे प्रदूषण आणि हरित वायूंमुळे ट्रोपोस्फियर वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा वेग प्रतिदशक ५० ते ६० मीटर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. ही उंची आजपर्यंत २०० मीटरने वाढली आहे.

वाढलेले तापमान यामुळेच !

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. या गरमीमुळे भविष्यात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता प्रभावित होईल, हवामान आणि ऋतूंवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.

जागतिक प्रयत्नांमुळे २०० पासून ओझोनचा थर भरून निघत आहे, त्या धर्तीवर वायू प्रदूषण थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे ट्रोपोस्फियरचे गरम होणे हळूहळू थांबेल. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे.

- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

 

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामान