शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 11:50 IST

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे

ठळक मुद्देपृथ्वीचे ट्रोपोस्फियर तापमानवाढ धोकादायक : भविष्यात उष्णलहरींचा धोका

नागपूर : एका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधनातून धोकादायक बाब पुढे आली आहे. प्रदूषण आणि हरित वायूंमुळे पृथ्वीचे ट्रोपोस्फियर (अंतरावरण) गरम झाले आहे. मागील ४० वर्षात या अंतरावरणाची उंची आणि सीमा २०० मीटरने वाढली आहे. परिणामत: भविष्यात अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होणार असून उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा यावर विपरित परिणाम होण्याचा इशारा या संशोधनातून देण्यात आला आहे.

नानजिंग विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संशोधक लिग्युन मेंग, तसेच कॅनडा, ऑस्ट्रिया येथील संशोधक जेन लिऊ, डेव्हिड तारासिक, विल्यम रेनेडेल, आद्रिया स्टेनर, हेलेंजर विल्हेम्सेन, ली वेंग यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. १९८० ते २०२० या ४० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात झालेल्या बदलांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. उत्तर गोलार्धातील भूप्रदेश आणि २० ते ८० अक्षांशावरील हवामान क्षेत्रावर हे अध्ययन करण्यात आले होते.

या संशोधकांच्या निरीक्षणानुसार, १९६० पूर्वी पृथ्वीचे आवरण स्थिर होते. पृथ्वीवर मानवनिर्मित हरितवायू तयार होत गेले. ते थरात साचले. यामुळे पृथ्वीच्या ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेले. २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे प्रदूषण आणि हरित वायूंमुळे ट्रोपोस्फियर वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा वेग प्रतिदशक ५० ते ६० मीटर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. ही उंची आजपर्यंत २०० मीटरने वाढली आहे.

वाढलेले तापमान यामुळेच !

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. या गरमीमुळे भविष्यात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता प्रभावित होईल, हवामान आणि ऋतूंवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.

जागतिक प्रयत्नांमुळे २०० पासून ओझोनचा थर भरून निघत आहे, त्या धर्तीवर वायू प्रदूषण थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे ट्रोपोस्फियरचे गरम होणे हळूहळू थांबेल. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे.

- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

 

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामान