शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 11:50 IST

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे

ठळक मुद्देपृथ्वीचे ट्रोपोस्फियर तापमानवाढ धोकादायक : भविष्यात उष्णलहरींचा धोका

नागपूर : एका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधनातून धोकादायक बाब पुढे आली आहे. प्रदूषण आणि हरित वायूंमुळे पृथ्वीचे ट्रोपोस्फियर (अंतरावरण) गरम झाले आहे. मागील ४० वर्षात या अंतरावरणाची उंची आणि सीमा २०० मीटरने वाढली आहे. परिणामत: भविष्यात अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होणार असून उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा यावर विपरित परिणाम होण्याचा इशारा या संशोधनातून देण्यात आला आहे.

नानजिंग विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संशोधक लिग्युन मेंग, तसेच कॅनडा, ऑस्ट्रिया येथील संशोधक जेन लिऊ, डेव्हिड तारासिक, विल्यम रेनेडेल, आद्रिया स्टेनर, हेलेंजर विल्हेम्सेन, ली वेंग यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. १९८० ते २०२० या ४० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात झालेल्या बदलांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. उत्तर गोलार्धातील भूप्रदेश आणि २० ते ८० अक्षांशावरील हवामान क्षेत्रावर हे अध्ययन करण्यात आले होते.

या संशोधकांच्या निरीक्षणानुसार, १९६० पूर्वी पृथ्वीचे आवरण स्थिर होते. पृथ्वीवर मानवनिर्मित हरितवायू तयार होत गेले. ते थरात साचले. यामुळे पृथ्वीच्या ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेले. २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे प्रदूषण आणि हरित वायूंमुळे ट्रोपोस्फियर वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा वेग प्रतिदशक ५० ते ६० मीटर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. ही उंची आजपर्यंत २०० मीटरने वाढली आहे.

वाढलेले तापमान यामुळेच !

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. या गरमीमुळे भविष्यात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता प्रभावित होईल, हवामान आणि ऋतूंवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.

जागतिक प्रयत्नांमुळे २०० पासून ओझोनचा थर भरून निघत आहे, त्या धर्तीवर वायू प्रदूषण थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे ट्रोपोस्फियरचे गरम होणे हळूहळू थांबेल. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे.

- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

 

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामान