शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सावधान! प्रदूषणामुळे तापतेय पृथ्वीचे अंतरावरण; १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 11:50 IST

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे

ठळक मुद्देपृथ्वीचे ट्रोपोस्फियर तापमानवाढ धोकादायक : भविष्यात उष्णलहरींचा धोका

नागपूर : एका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संशोधनातून धोकादायक बाब पुढे आली आहे. प्रदूषण आणि हरित वायूंमुळे पृथ्वीचे ट्रोपोस्फियर (अंतरावरण) गरम झाले आहे. मागील ४० वर्षात या अंतरावरणाची उंची आणि सीमा २०० मीटरने वाढली आहे. परिणामत: भविष्यात अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होणार असून उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा यावर विपरित परिणाम होण्याचा इशारा या संशोधनातून देण्यात आला आहे.

नानजिंग विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संशोधक लिग्युन मेंग, तसेच कॅनडा, ऑस्ट्रिया येथील संशोधक जेन लिऊ, डेव्हिड तारासिक, विल्यम रेनेडेल, आद्रिया स्टेनर, हेलेंजर विल्हेम्सेन, ली वेंग यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. १९८० ते २०२० या ४० वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात झालेल्या बदलांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. उत्तर गोलार्धातील भूप्रदेश आणि २० ते ८० अक्षांशावरील हवामान क्षेत्रावर हे अध्ययन करण्यात आले होते.

या संशोधकांच्या निरीक्षणानुसार, १९६० पूर्वी पृथ्वीचे आवरण स्थिर होते. पृथ्वीवर मानवनिर्मित हरितवायू तयार होत गेले. ते थरात साचले. यामुळे पृथ्वीच्या ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेले. २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे अलीकडे प्रदूषण आणि हरित वायूंमुळे ट्रोपोस्फियर वेगाने पुढे सरकत आहे. त्याचा वेग प्रतिदशक ५० ते ६० मीटर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. ही उंची आजपर्यंत २०० मीटरने वाढली आहे.

वाढलेले तापमान यामुळेच !

ट्रोपोस्फियरच्या खालचे वातावरण गरम होत गेल्यामुळेच पृथ्वीवरील तापमान अलीकडे वाढले आहे. या वाढीमुळे यंदाचा गेल्या १०० वर्षांचा तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. या गरमीमुळे भविष्यात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता प्रभावित होईल, हवामान आणि ऋतूंवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे.

जागतिक प्रयत्नांमुळे २०० पासून ओझोनचा थर भरून निघत आहे, त्या धर्तीवर वायू प्रदूषण थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केले गेले तर निश्चितपणे ट्रोपोस्फियरचे गरम होणे हळूहळू थांबेल. सरकारनेही यात लक्ष घालण्याची गरज आहे.

- सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

 

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामान