शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

प्रत्येक कॉलेजला लावावी लागणार ५०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:56 IST

२०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देवृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यांचीही माहिती मागितलीडीटीईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे. ‘डीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी प्रत्येकी ५०० वृक्षांची लागवड करावी, असे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील सर्व अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए व एमसीए संस्थांच्या प्राचार्यांना यासंदर्भातील पत्रदेखील पाठविण्यात आले आहेत.३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ‘ग्रीन आर्मी’ म्हणून नोंदणी करायची आहे. याशिवाय वृक्षारोपणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांबाबतचा अहवालदेखील सादर करायचा आहे. यासंदर्भात ‘डीटीई’ने २४ एप्रिल रोजीच सर्व महाविद्यालयांना पत्र लिहिले होते. मात्र बहुतांश जणांनी हे पत्र गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांनी सर्व महाविद्यालयांची पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली आहे. शासन तसेच महसूल विभागाकडून अहवालासंदर्भात वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी खड्ड्यांची माहिती संकेतस्थळावर ‘अपलोड’ करावी तसेच ‘डीटीई’ला सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत विभागाला २६ हजार ६०० झाडे लावायची आहेत. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाने ५०० झाडे लावावी, अशी सूचनादेखील डॉ.थोरात यांनी दिली आहे. केवळ लेखी माहिती न देता संबंधित वृक्षारोपणाची छायाचित्रेदेखील सादर करावीत तसेच सर्व संस्थांनी निर्देशांचे पालन करावे व पर्यावरण संवर्धनास मदत करावी, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.अगोदरच्या मोहिमांचे काय झाले ?२०१३ सालीदेखील राज्य शासनाच्या पुढाकारानंतर ‘डीटीई’ने सर्व महाविद्यालयांना प्रत्येक १०० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचा अहवालदेखील महाविद्यालयांकडून मागविला होता. मात्र अनेक महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तसेच महाविद्यालयांनी लावलेल्यापैकी नेमके किती वृक्ष जगले याची माहितीदेखील उपलब्ध नाही.

टॅग्स :collegeमहाविद्यालय