शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

पृथ्वी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:28 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर : डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.वनराई फाऊंडेशन नागपूर तर्फे डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी शंकरनगरातील धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. विकास सिरपूरकर यांच्याहस्ते ऋतुध्वज ऊर्फ बाबा देशपांडे व प्रा. अलोक शेवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबुराव तिडके, प्रमुख अतिथी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्यासह अनंतराव घारड, समीर सराफ, अजय पाटील, अनिल राठी, विकास खिंचा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राकेश कुमार म्हणाले की, पर्यावरणाला आयुष्य समर्पण करण्याची वृत्ती राहिलेली नाही. त्यामुळे हजारो वर्षापासून जी इकोसिस्टीम बनलेली आहे, ती नष्ट होत आहे. परंतु शासनाने आता त्याला गंभीरतेने घेतले आहे. कुठल्याही प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी जसा गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला जातो. तसा तेथील इकोसिस्टीमचाही अहवाल मागविला जातो. प्रसंगी बाबुराव तिडके म्हणाले की, एकीकडे झाडे जगविण्याची जी धडपड बाबा देशपांडे करीत आहे, दुसरीकडे वन नष्ट केली जात आहे. त्याचे परिणाम आपण भोगतो आहे. सत्काराला उत्तर देताना प्रा. आलोक शेवडे म्हणाले की, कीटकांचे सौंदर्यात्मक बाजू मांडणे माझा छंद आहे. कीटकाने मला जगाच्या पाठीवर पाऊल ठेवण्याची संधी दिली आहे. बाबा देशपांडे यांनी वृक्षाचे संवर्धन ही माझी पॅशन आहे. ७३ वर्षाचा असतानाही वनराईच्या मिळालेल्या साथीमुळे आणखी काम करायचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.

टॅग्स :Earthपृथ्वीVanraiवनराई