शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पृथ्वी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:28 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर : डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.वनराई फाऊंडेशन नागपूर तर्फे डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी शंकरनगरातील धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. विकास सिरपूरकर यांच्याहस्ते ऋतुध्वज ऊर्फ बाबा देशपांडे व प्रा. अलोक शेवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबुराव तिडके, प्रमुख अतिथी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्यासह अनंतराव घारड, समीर सराफ, अजय पाटील, अनिल राठी, विकास खिंचा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राकेश कुमार म्हणाले की, पर्यावरणाला आयुष्य समर्पण करण्याची वृत्ती राहिलेली नाही. त्यामुळे हजारो वर्षापासून जी इकोसिस्टीम बनलेली आहे, ती नष्ट होत आहे. परंतु शासनाने आता त्याला गंभीरतेने घेतले आहे. कुठल्याही प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी जसा गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला जातो. तसा तेथील इकोसिस्टीमचाही अहवाल मागविला जातो. प्रसंगी बाबुराव तिडके म्हणाले की, एकीकडे झाडे जगविण्याची जी धडपड बाबा देशपांडे करीत आहे, दुसरीकडे वन नष्ट केली जात आहे. त्याचे परिणाम आपण भोगतो आहे. सत्काराला उत्तर देताना प्रा. आलोक शेवडे म्हणाले की, कीटकांचे सौंदर्यात्मक बाजू मांडणे माझा छंद आहे. कीटकाने मला जगाच्या पाठीवर पाऊल ठेवण्याची संधी दिली आहे. बाबा देशपांडे यांनी वृक्षाचे संवर्धन ही माझी पॅशन आहे. ७३ वर्षाचा असतानाही वनराईच्या मिळालेल्या साथीमुळे आणखी काम करायचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.

टॅग्स :Earthपृथ्वीVanraiवनराई