शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:24 IST

राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्दे‘रॅली’दरम्यान जीवे मारण्याची धमकी दिली :तानाजी वनवे यांचा शहराध्यक्ष ठाकरेंवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.‘भारत बंद’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे रामनगरहून ‘रॅली’ काढण्यात आली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा.काँग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री राजेंद्र मुळक हे सहभागी झाले होते. या ‘रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी मीदेखील रामनगर येथे पोहोचलो. मात्र गोकुळपेठ येथे पोहोचल्यावर ठाकरे यांनी मला धक्का मारला. तसेच येथे कुणी बोलविले आहे व का आले आहात असा प्रश्न विचारला. येथून निघून जा, अन्यथा जीवे मारून टाकील, अशी धमकी ठाकरे यांनी दिली, असा आरोप वनवे यांनी लावला. यानंतर वनवे ‘रॅली’तून बाहेर पडले व अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उल्लेखनीय आहे की शहर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. एका बाजूला मुत्तेमवार-ठाकरे तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांचे समर्थक आहेत. चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणात त्यांच्या समर्थकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. वनवे हे त्याच गटातील आहेत.यशस्वी बंदमुळे विरोधी घाबरलेविकास ठाकरे यांना या आरोपांबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. सोमवारी वनवे कुठेही दिसलेच नाहीत. ‘भारत बंद’ नागपुरात यशस्वी झाला. त्यामुळे विरोधी घाबरले आहेत. भाजपच्या इशाºयावर असे तथ्यहीन आरोप लावले जात आहेत, असे ठाकरे म्हणाले. मी पश्चिम नागपुरातून विधानसभा निवडणूक लढलो आहे. त्यामुळेच राजकुमार कमनानी यांनी काढलेल्या ‘रॅली’त मी सहभागी झालो. वनवे यात सहभागीच झाले नव्हते. पक्षाचे इतरही वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. त्यांनादेखील विचारले जाऊ शकते, असा दावादेखील ठाकरे यांनी केला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर