शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

नागपुरात बंददरम्यानदेखील काँग्रेसमध्ये गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:24 IST

राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्दे‘रॅली’दरम्यान जीवे मारण्याची धमकी दिली :तानाजी वनवे यांचा शहराध्यक्ष ठाकरेंवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल करार व इंधन दरवाढीवरून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’साठी काँग्रेसचे नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारविरोधातील या आंदोलनातदेखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप लावला. वनवे यांनी ठाकरे यांच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. दुसरीकडे विकास ठाकरे यांनी आरोपांचे खंडन केले असून वनवे तर आंदोलनात कुठे दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.‘भारत बंद’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे रामनगरहून ‘रॅली’ काढण्यात आली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार मुकुल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा.काँग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चे अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री राजेंद्र मुळक हे सहभागी झाले होते. या ‘रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी मीदेखील रामनगर येथे पोहोचलो. मात्र गोकुळपेठ येथे पोहोचल्यावर ठाकरे यांनी मला धक्का मारला. तसेच येथे कुणी बोलविले आहे व का आले आहात असा प्रश्न विचारला. येथून निघून जा, अन्यथा जीवे मारून टाकील, अशी धमकी ठाकरे यांनी दिली, असा आरोप वनवे यांनी लावला. यानंतर वनवे ‘रॅली’तून बाहेर पडले व अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उल्लेखनीय आहे की शहर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. एका बाजूला मुत्तेमवार-ठाकरे तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व त्यांचे समर्थक आहेत. चतुर्वेदी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणात त्यांच्या समर्थकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. वनवे हे त्याच गटातील आहेत.यशस्वी बंदमुळे विरोधी घाबरलेविकास ठाकरे यांना या आरोपांबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. सोमवारी वनवे कुठेही दिसलेच नाहीत. ‘भारत बंद’ नागपुरात यशस्वी झाला. त्यामुळे विरोधी घाबरले आहेत. भाजपच्या इशाºयावर असे तथ्यहीन आरोप लावले जात आहेत, असे ठाकरे म्हणाले. मी पश्चिम नागपुरातून विधानसभा निवडणूक लढलो आहे. त्यामुळेच राजकुमार कमनानी यांनी काढलेल्या ‘रॅली’त मी सहभागी झालो. वनवे यात सहभागीच झाले नव्हते. पक्षाचे इतरही वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. त्यांनादेखील विचारले जाऊ शकते, असा दावादेखील ठाकरे यांनी केला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर