शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अत्यल्प पर्जन्यमानामुळे वर्धा परिसरातील शेतकऱ्यांच्या ओलिताला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:54 PM

वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे.

ठळक मुद्देएका पिकावरच काम भागवावे लागले जनावरांचे स्थानांतरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे. केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. अन्यत्र पाण्याअभावी दुष्काळाची परिस्थिती भिषणावह आहे. बोर सिंचन प्रकल्पाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या २५ ते ३० गावांमध्ये शेतातील विहिर आटल्या असून फेब्रुवारी महिन्यातच दर तासानंतर शेती पंपाद्वारे होत असलेले ओलित थांबवावे लागत आहे. गेल्या २५ वर्षांत असा प्रसंग यंदाच अनुभवावा लागत असल्याचे या भागातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वर्धा जिल्ह्यातील बोर सिंचन प्रकल्पा सर्वात जुना प्रकल्प आहे. १९५८ ते ६५ दरम्यान हा सिंचन प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास २५ ते ३० गावांना पाणी शेतीसाठी दिले जाते. मात्र यावर्षी पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. या प्रकल्पामध्ये पाणी नसल्याने परिसरातील शेतातील विहिरींची पातळीही घसरली आहे. या भागात ओलिताची सोय असल्याने शेतकरी दुबार पीक घेत होते. यंदामात्र धरणाचे पाणी चना, व गहू पिकासाठी मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पिकांचे क्षेत्र घटलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिर आहे. त्या शेतकऱ्यांनी जवळील पाण्याच्या भरोश्यावर गहू लावला मात्र आता विहिरीचे पाणी तुटत असल्याने गव्हाच्या ओलितावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा धरण पट्ट्यातील अनेक गावात पिकाअभावी शेत रिकामे पडून आहे. तर धरणालगतच्या गावांमधून दुधाळू जनावरे घेऊन गवळी समाजाचे लोक दुसऱ्या गावात स्थानांतरीत होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तसेच या परिसरातील पाणी पुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने बोरधरण भरले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात गहू, चना पिकाला पाणी मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीवरील पाण्याच्या भरोश्यावर गहू व चना पीक घेतले. त्यांनाही आता विहिरीची पाणी पातळी कमी झाल्याने ओलितावर फटका बसत आहे. दर तासानंतर मोटरपंप बंद करावे लागत आहे. व विहिरीला पाणी येण्याची वाट पहावी लागत आहे.अमीत सुधाकर माहुरे, शेतकरी, जाखाळा घोराड

टॅग्स :Farmerशेतकरी