शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प पर्जन्यमानामुळे वर्धा परिसरातील शेतकऱ्यांच्या ओलिताला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:56 IST

वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे.

ठळक मुद्देएका पिकावरच काम भागवावे लागले जनावरांचे स्थानांतरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे. केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. अन्यत्र पाण्याअभावी दुष्काळाची परिस्थिती भिषणावह आहे. बोर सिंचन प्रकल्पाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या २५ ते ३० गावांमध्ये शेतातील विहिर आटल्या असून फेब्रुवारी महिन्यातच दर तासानंतर शेती पंपाद्वारे होत असलेले ओलित थांबवावे लागत आहे. गेल्या २५ वर्षांत असा प्रसंग यंदाच अनुभवावा लागत असल्याचे या भागातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वर्धा जिल्ह्यातील बोर सिंचन प्रकल्पा सर्वात जुना प्रकल्प आहे. १९५८ ते ६५ दरम्यान हा सिंचन प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास २५ ते ३० गावांना पाणी शेतीसाठी दिले जाते. मात्र यावर्षी पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. या प्रकल्पामध्ये पाणी नसल्याने परिसरातील शेतातील विहिरींची पातळीही घसरली आहे. या भागात ओलिताची सोय असल्याने शेतकरी दुबार पीक घेत होते. यंदामात्र धरणाचे पाणी चना, व गहू पिकासाठी मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पिकांचे क्षेत्र घटलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिर आहे. त्या शेतकऱ्यांनी जवळील पाण्याच्या भरोश्यावर गहू लावला मात्र आता विहिरीचे पाणी तुटत असल्याने गव्हाच्या ओलितावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा धरण पट्ट्यातील अनेक गावात पिकाअभावी शेत रिकामे पडून आहे. तर धरणालगतच्या गावांमधून दुधाळू जनावरे घेऊन गवळी समाजाचे लोक दुसऱ्या गावात स्थानांतरीत होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तसेच या परिसरातील पाणी पुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने बोरधरण भरले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात गहू, चना पिकाला पाणी मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीवरील पाण्याच्या भरोश्यावर गहू व चना पीक घेतले. त्यांनाही आता विहिरीची पाणी पातळी कमी झाल्याने ओलितावर फटका बसत आहे. दर तासानंतर मोटरपंप बंद करावे लागत आहे. व विहिरीला पाणी येण्याची वाट पहावी लागत आहे.अमीत सुधाकर माहुरे, शेतकरी, जाखाळा घोराड

टॅग्स :Farmerशेतकरी