शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा अन् रेड सिग्नलमुळे दुचाकी चालकांना उष्माघाताचा धोका

By नरेश डोंगरे | Updated: April 20, 2023 14:48 IST

दुचाकीचालकांसह रिक्षा ओढणाऱ्यांचे उन्हामुळे हाल : सिग्नलवर ग्रीन नेटची प्रतिक्षा

नागपूर :नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशात भर दुपारी 'रेड सिग्नल'मुळे दुचाकीचालक, सायकल रिक्षा ओढणाऱ्यांना सिग्नलवर उभे राहावे लागत आहे. शहरातील सिग्नलवर अद्याप 'ग्रीन नेट'ची व्यवस्था न झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्याने दुचाकीचालक तसेच सायकल रिक्षा ओढणारांना उष्माघाताचा धोका होण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

नागपूर - विदर्भातील उन्हाळा अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसतो. एप्रिल-मे मध्ये उन्हाचा पारा ४७ - ४८ डिग्रीच्या पुढे जातो. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक जण सकाळी बाहेर पडून काम आटोपतात आणि दुपारी १२ च्या आत घरात परततात. अनेक जण थेट सायंकाळी ६ नंतरच घराबाहेर पडणे पसंत करतात. मात्र, रोजच्या रोजी-रोटीचा सवाल असलेले लाखो जण भर उन्हातच रोजगार आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहतात. तीव्र उन्हात त्यांची ईकडून तिकडे धावपळ सुरू असते. यातील बहुतांश मंडळी दुचाकीने जात-येत असतात.

शहरातील वाहतूक व्यवस्था संचलित करणारे बहुतांश मोठ्या चाैकातील आणि गजबजलेल्या भागातील स्वयंचलित सिग्नल सुरूच असल्याने दुचाकी चालकांना रेड सिग्नलमुळे सिग्नलवर उभे राहावे लागते. त्यामुळे दुचाकीवरील मंडळींना उन्हाचा तडाखा बसतो. आपल्या छोट्या मुलांना किंवा आजारी असलेल्या नातेवाईकांना दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या व्यक्तींचे सर्वाधिक हाल होतात. सायकल रिक्षा आणि मालवाहू सायकलरिक्षा ओढणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हामुळे त्यांना उष्माघात होण्याचा आणि त्याच्या जिविताचाही धोका वाढतो.

कुठे आहेत सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था ?

विशेष म्हणजे, शहरातील काही सेवाभावी व्यक्ती, प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था उन्हाळ्यात दरवर्षी गजबजलेल्या भागातील तसेच मोठ्या वर्दळीच्या मार्गावरील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या वर चारही बाजूंनी ग्रीन नेट लावायचे. त्यामुळे सिग्नलवर सावली निर्माण होत असल्याने त्याखाली उभे राहणाऱ्या दुचाकीचालकांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळायचे. आता मात्र एप्रिल महिन्याची २० तारिख झाली तरी अद्याप कुण्या चाैकातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दुचाकीचालकांचे, सायकल रिक्षा ओढणारांचे हाल होत आहे.

ट्रॅफिक विभागाकडूनही पुढाकार नाही

एप्रिल- मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुचाकीचालकांचे हाल होऊ नये म्हणून वर्दळीच्या मार्गातील चाैकावरचे सिग्नल दुपारी २ ते ५ च्या दरम्यान बंद ठेवण्याचा (वाहतूक बिनदिक्कत सुरू ठेवण्याचा) प्रयोग याआधी शहरात झाला आहे. यंदा तशी काही व्यवस्था झालेली नाही किंवा दुचाकी चालकांचे, सायकल रिक्षा चालकांचे प्रखर उन्हामुळे होणारे हाल रोखण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांकडून अद्याप पुढाकार घेण्यात आलेला नाही.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर