शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उन्हाचा तडाखा अन् रेड सिग्नलमुळे दुचाकी चालकांना उष्माघाताचा धोका

By नरेश डोंगरे | Updated: April 20, 2023 14:48 IST

दुचाकीचालकांसह रिक्षा ओढणाऱ्यांचे उन्हामुळे हाल : सिग्नलवर ग्रीन नेटची प्रतिक्षा

नागपूर :नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशात भर दुपारी 'रेड सिग्नल'मुळे दुचाकीचालक, सायकल रिक्षा ओढणाऱ्यांना सिग्नलवर उभे राहावे लागत आहे. शहरातील सिग्नलवर अद्याप 'ग्रीन नेट'ची व्यवस्था न झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्याने दुचाकीचालक तसेच सायकल रिक्षा ओढणारांना उष्माघाताचा धोका होण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

नागपूर - विदर्भातील उन्हाळा अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसतो. एप्रिल-मे मध्ये उन्हाचा पारा ४७ - ४८ डिग्रीच्या पुढे जातो. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक जण सकाळी बाहेर पडून काम आटोपतात आणि दुपारी १२ च्या आत घरात परततात. अनेक जण थेट सायंकाळी ६ नंतरच घराबाहेर पडणे पसंत करतात. मात्र, रोजच्या रोजी-रोटीचा सवाल असलेले लाखो जण भर उन्हातच रोजगार आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहतात. तीव्र उन्हात त्यांची ईकडून तिकडे धावपळ सुरू असते. यातील बहुतांश मंडळी दुचाकीने जात-येत असतात.

शहरातील वाहतूक व्यवस्था संचलित करणारे बहुतांश मोठ्या चाैकातील आणि गजबजलेल्या भागातील स्वयंचलित सिग्नल सुरूच असल्याने दुचाकी चालकांना रेड सिग्नलमुळे सिग्नलवर उभे राहावे लागते. त्यामुळे दुचाकीवरील मंडळींना उन्हाचा तडाखा बसतो. आपल्या छोट्या मुलांना किंवा आजारी असलेल्या नातेवाईकांना दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या व्यक्तींचे सर्वाधिक हाल होतात. सायकल रिक्षा आणि मालवाहू सायकलरिक्षा ओढणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हामुळे त्यांना उष्माघात होण्याचा आणि त्याच्या जिविताचाही धोका वाढतो.

कुठे आहेत सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था ?

विशेष म्हणजे, शहरातील काही सेवाभावी व्यक्ती, प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था उन्हाळ्यात दरवर्षी गजबजलेल्या भागातील तसेच मोठ्या वर्दळीच्या मार्गावरील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या वर चारही बाजूंनी ग्रीन नेट लावायचे. त्यामुळे सिग्नलवर सावली निर्माण होत असल्याने त्याखाली उभे राहणाऱ्या दुचाकीचालकांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळायचे. आता मात्र एप्रिल महिन्याची २० तारिख झाली तरी अद्याप कुण्या चाैकातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दुचाकीचालकांचे, सायकल रिक्षा ओढणारांचे हाल होत आहे.

ट्रॅफिक विभागाकडूनही पुढाकार नाही

एप्रिल- मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुचाकीचालकांचे हाल होऊ नये म्हणून वर्दळीच्या मार्गातील चाैकावरचे सिग्नल दुपारी २ ते ५ च्या दरम्यान बंद ठेवण्याचा (वाहतूक बिनदिक्कत सुरू ठेवण्याचा) प्रयोग याआधी शहरात झाला आहे. यंदा तशी काही व्यवस्था झालेली नाही किंवा दुचाकी चालकांचे, सायकल रिक्षा चालकांचे प्रखर उन्हामुळे होणारे हाल रोखण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांकडून अद्याप पुढाकार घेण्यात आलेला नाही.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर