शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

उन्हाचा तडाखा अन् रेड सिग्नलमुळे दुचाकी चालकांना उष्माघाताचा धोका

By नरेश डोंगरे | Updated: April 20, 2023 14:48 IST

दुचाकीचालकांसह रिक्षा ओढणाऱ्यांचे उन्हामुळे हाल : सिग्नलवर ग्रीन नेटची प्रतिक्षा

नागपूर :नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशात भर दुपारी 'रेड सिग्नल'मुळे दुचाकीचालक, सायकल रिक्षा ओढणाऱ्यांना सिग्नलवर उभे राहावे लागत आहे. शहरातील सिग्नलवर अद्याप 'ग्रीन नेट'ची व्यवस्था न झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्याने दुचाकीचालक तसेच सायकल रिक्षा ओढणारांना उष्माघाताचा धोका होण्याचीही भीती निर्माण झाली आहे.

नागपूर - विदर्भातील उन्हाळा अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसतो. एप्रिल-मे मध्ये उन्हाचा पारा ४७ - ४८ डिग्रीच्या पुढे जातो. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक जण सकाळी बाहेर पडून काम आटोपतात आणि दुपारी १२ च्या आत घरात परततात. अनेक जण थेट सायंकाळी ६ नंतरच घराबाहेर पडणे पसंत करतात. मात्र, रोजच्या रोजी-रोटीचा सवाल असलेले लाखो जण भर उन्हातच रोजगार आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहतात. तीव्र उन्हात त्यांची ईकडून तिकडे धावपळ सुरू असते. यातील बहुतांश मंडळी दुचाकीने जात-येत असतात.

शहरातील वाहतूक व्यवस्था संचलित करणारे बहुतांश मोठ्या चाैकातील आणि गजबजलेल्या भागातील स्वयंचलित सिग्नल सुरूच असल्याने दुचाकी चालकांना रेड सिग्नलमुळे सिग्नलवर उभे राहावे लागते. त्यामुळे दुचाकीवरील मंडळींना उन्हाचा तडाखा बसतो. आपल्या छोट्या मुलांना किंवा आजारी असलेल्या नातेवाईकांना दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या व्यक्तींचे सर्वाधिक हाल होतात. सायकल रिक्षा आणि मालवाहू सायकलरिक्षा ओढणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हामुळे त्यांना उष्माघात होण्याचा आणि त्याच्या जिविताचाही धोका वाढतो.

कुठे आहेत सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था ?

विशेष म्हणजे, शहरातील काही सेवाभावी व्यक्ती, प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था उन्हाळ्यात दरवर्षी गजबजलेल्या भागातील तसेच मोठ्या वर्दळीच्या मार्गावरील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या वर चारही बाजूंनी ग्रीन नेट लावायचे. त्यामुळे सिग्नलवर सावली निर्माण होत असल्याने त्याखाली उभे राहणाऱ्या दुचाकीचालकांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळायचे. आता मात्र एप्रिल महिन्याची २० तारिख झाली तरी अद्याप कुण्या चाैकातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दुचाकीचालकांचे, सायकल रिक्षा ओढणारांचे हाल होत आहे.

ट्रॅफिक विभागाकडूनही पुढाकार नाही

एप्रिल- मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुचाकीचालकांचे हाल होऊ नये म्हणून वर्दळीच्या मार्गातील चाैकावरचे सिग्नल दुपारी २ ते ५ च्या दरम्यान बंद ठेवण्याचा (वाहतूक बिनदिक्कत सुरू ठेवण्याचा) प्रयोग याआधी शहरात झाला आहे. यंदा तशी काही व्यवस्था झालेली नाही किंवा दुचाकी चालकांचे, सायकल रिक्षा चालकांचे प्रखर उन्हामुळे होणारे हाल रोखण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांकडून अद्याप पुढाकार घेण्यात आलेला नाही.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर