शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

'या' कारणांमुळे 'ही' झाडे छाेट्या वादळातही उन्मळून पडतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:57 AM

Nagpur News पावसाळ्याच्या लहान-माेठ्या वादळ किंवा वाऱ्यामुळे जी झाडे अधिक काेसळणाऱ्यांमध्ये रेन ट्री (चिचव्यासारखे बारीक पानांचे), काशिद, साेनमाेहर, गुलमाेहर अशा विदेशी झाडांचा समावेश अधिक असताे.

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: पावसाळा किंवा उन्हाळ्यातही वादळ आले की, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे किंवा त्यांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र नीट अभ्यास केला की, काही विशिष्ट प्रजातीचीच झाडे उन्मळून पडण्याचा प्रकार तुमच्या लक्षात येऊ शकताे. वनस्पतीतज्ज्ञ प्राची माहुरकर यांनी यावर प्रकाश टाकला. पावसाळ्याच्या लहान-माेठ्या वादळ किंवा वाऱ्यामुळे जी झाडे अधिक काेसळणाऱ्यांमध्ये रेन ट्री (चिचव्यासारखे बारीक पानांचे), काशिद, साेनमाेहर, गुलमाेहर अशा विदेशी झाडांचा समावेश अधिक असताे. याशिवाय शिरीष, जांभूळ व पांगारासारखी देसी प्रजातीची झाडेही उन्मळून पडतात. प्राची माहुरकर यांनी यामागे तीन प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट केले.

- रस्त्याच्या कडेला मुख्यत्वे भरभर वाढणारी विदेशी झाडे लावण्यात येतात. माेठे वाढणारे रेन ट्री, गुलमाेहर, साेनमाेहर आदींचा समावेश अधिक असताे. वेगाने वाढत असल्याने मुळे कमजाेर असतात व त्यांच्या फांद्याही तुलनेने कमकुवतच असतात. ही झाडे लवकर वाढतात आणि लवकर तुटतातही. या तुलनेत देसी झाडे माेठ्या वादळातही मजबुतीने उभी राहतात.

- दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे नेहमीच्या विकासकामांमुळे त्यांची मुळे तुटत राहतात. कधी रस्ते दुरुस्ती, कधी नाल्या तर कधी केबल टाकण्यासारख्या कामात त्यांची मुळे कापली जातात. त्यामुळे या झाडांचा आधार कमजाेर हाेताे व छाेट्याशा वादळ, वाऱ्यानेही ती उन्मळून पडतात किंवा फांद्या तुटतात.

- तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ही झाडे एकेकटी उभी असतात. त्यांना इतर झाडांचा आधार मिळत नाही. जंगलातील झाडे एकमेकांच्या मुळांच्या आधाराने मजबुतीने उभी राहतात. तसा आधार यांना मिळत नाही.

टॅग्स :Rainपाऊस