शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

बनावट कंपनीचे पाणी पुरविल्यामुळे प्रवासी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:42 IST

निळ्या रंगाची पाण्याची बॉटल आणि त्याला हिरव्या रंगाचे झाकण असा प्रकार पाहून दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील प्रवासी संतप्त झाले. त्यांनी याविरुद्ध लेखी तक्रार केली. नागपुरात दुपारी २.५५ वाजता ही गाडी येताच या गाडीतील पाण्याच्या ८७६ बॉटल आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.

ठळक मुद्देनागपुरात ८७६ बॉटल घेतल्या ताब्यात : दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निळ्या रंगाची पाण्याची बॉटल आणि त्याला हिरव्या रंगाचे झाकण असा प्रकार पाहून दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील प्रवासी संतप्त झाले. त्यांनी याविरुद्ध लेखी तक्रार केली. नागपुरात दुपारी २.५५ वाजता ही गाडी येताच या गाडीतील पाण्याच्या ८७६ बॉटल आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.नागपुरातील ३२ प्रवासी काशी विश्वानाथच्या दर्शनासाठी गेले होते. सोमवारी दर्शन आटोपून ते १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या बी-३ कोचने परत येत होते. गाडी सुटल्यानंतर एका तासाने त्यांनी पेंट्रीकारच्या व्हेंडरला पाण्याची बॉटल मागितली. या गाडीतील प्रवासी अमर नागपाल, किशोर रंघवानी, राजेश केवलरामानी यांनी सांगितले की, त्यांना पुरविण्यात आलेल्या बॉटलचे रॅपर वेगळ्या कंपनीचे आणि झाकण वेगळ्या रंगाचे होते. झाकण सील केलेले नव्हते. रेल्वेत रेल नीर कंपनीशिवाय दुसऱ्या कंपन्यांचे पाणी विकत नसल्याचे अमर नागपाल यांना माहीत होते. यातील १२ प्रवासी पेंट्रीकारमध्ये गेल्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पेंट्रीकार कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या बॉटलचे काही बॉक्स गाडीखाली फेकले. पेंट्रीकारच्या प्रमुखाने प्रवाशांवरच चेन पुलिंगचा आरोप लावला. चेन पुलिंग झाल्यामुळे आरपीएफचे जवान पेंट्रीकारमध्ये पोहोचले. पेंट्रीकारच्या व्यवस्थापकाने तक्रार पुस्तिका देण्यास नकार दिला. गाडीतील टीटीईसुद्धा तक्रार पुस्तिका न देताच निघून गेले. अनेकदा मागणी केल्यानंतर प्रवाशांनी पेंट्रीकारमधून तक्रार पुस्तिका घेऊन तक्रार नोंदविली. तक्रारीची प्रतही प्रवाशांना देण्यात आली नाही. अखेर प्रवाशांनी मोबाईलमध्ये त्याचा फोटो घेतला. आरपीएफ जवानांनी बनावट कंपनीचे पाणी विक्री करीत असल्याकडे दुर्लक्ष करून प्रवाशांनाच चेन पुलिंगसाठी विचारणा करून वेळ वाया घालविला. प्रवाशांनी या बाबीची तक्रार इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझम कार्पोरेशन (आयआरसीटीसी) कडे केली. नागपुरात आयआरसीटीसीच्या चमूने पेंट्रीकारमधून ८७६ पाण्याच्या बॉटल ताब्यात घेतल्या. प्रवाशांनी पाण्याच्या बॉटल दाखविल्या असता, कचऱ्यातून उचलून त्यात पाणी भरून विकण्यात येत असल्याचा भास झाला.बनावट कंपनीचे पाणी गंभीर बाबरेल्वेगाड्यात रेल नीर कंपनीचेच पाणी विकले जावे, असे रेल्वे बोर्डाचे निर्देश आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट कंपनीचे पाणी पेंट्रीकारमधून विकल्या जात असल्यामुळे यात बड्या अधिकाऱ्यांचा हात असण्याची शंका आहे. या पाण्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. या बॉटलचे झाकणही सिल नसल्यामुळे कचऱ्यात पडलेल्या बॉटल उचलून त्यात पाणी भरून विकण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेWaterपाणी