शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

आर्थिक तुटीमुळे उपराजधानीतील तलाव संवर्धन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:08 AM

गणेश हूड। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्ष २०१९-२० मध्ये २,३८८ कोटी खर्चाचा अंदाज आहे. तर उत्पन्न २४०० कोटींच्या ...

ठळक मुद्दे७८.४३ कोटींची गरज : मनपावरील मोठ्या दायित्वामुळे निधी मिळणे अवघड

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०१९-२० मध्ये २,३८८ कोटी खर्चाचा अंदाज आहे. तर उत्पन्न २४०० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली. तसेच स्थायी समितीचा अर्थसंकल्प व वास्तविक उत्पन्न यात दरवर्षी २० टक्के तफावत असते. त्यातच ४९५.५१ कोटींची आवश्यक देणी थकीत आहेत. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची कपात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेला ७८.४३ कोटींचा खर्च करणे शक्य नसल्याने शहरातील तलाव संवर्धन अडचणीत आले आहे.अंबाझरी, गोरेवाडा, पांढराबोडी, नाईक तलाव, फुटाळा, लेंडी तलाव, पोलीस लाईन टाकळी व बिनाकी मंगळवारी तलावांच्या संवर्धनावर ७८.४३ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे अपेक्षित आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभराचा लेखाजोखा मांडून आर्थिक तुटीचे स्पष्ट संकेत दिलेत. अशा परिस्थितीत तलावांसाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही.मागील पाच वर्षात महानगरपालिकेचे ठोस उत्पन्न नसतानाही आयुक्तांनी सादर केलेल्या वित्तीय अंदाजपत्रकात महापालिका कायद्याने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून स्थायी समितीने अर्थसंकल्पीय आकडा अवाजवी फुगवण्याचे धोरण सुरू आहे. त्यामुळे आयुक्तांचे अंदाज व स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या अंदाजपत्रकात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात उत्पन्न कमी असतानाही केवळ अंदाजपत्रकात लेखाशीर्ष निर्माण करून त्यात तरतूद आहे. म्हणून कामे मंजूर करण्याची प्रथा सुरू राहिल्यामुळे त्यांच्या देयकांपोटी महापालिकेवर मोठा आर्थिक बोजा निर्माण झाला आहे.

देयकांचे दायित्व २५३.५१ कोटीमिळालेल्या माहितीनुसार रस्ते विद्युत व पाणीपुरवठा विभागात ३६ कोटी, लोककर्म विभागात ६० कोटी, पुरवठादारांचे १७ कोटी, पाणी टँकर ३ कोटी आणि पाणीपुरवठा योजना ११८ कोटी ८८ लाखांचे दायित्व नागपूर महापालिकेवर आहे. त्याशिवाय लेखा विभागात सादर झालेल्या परंतु अद्याप पारित न झालेल्या देयकांची रक्कम १८ कोटी ६३ लाख इतकी आहे. या दोन्ही रकमा मिळून केवळ देयकांपोटी २५३ कोटी ५१ लाखांचे दायित्व मनपावर आहे.

आवश्यक देणी १८१.५९ कोटीआपली तूट भरून काढण्यासाठी मनपा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकातून कपात होऊनही भविष्य निर्वाह निधीकडे जमा न केलेली रक्कम १०१ कोटी २१ लाख इतकी आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील व्याजाचे १९.४९ कोटींचे दायित्व आहे. सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या रजा रोखीकरणाची रक्कम ५ कोटी १९ लाख इतकी आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षात शिक्षण उपकरापोटी राज्य शासनाला देय असलेली ५५ कोटी ७० लाखांची रक्कम मनपाने गेल्या दोन वर्षापासून भरलेली नाही.तीन तलावांसाठी २९.३२ कोटी अनुदानसोनेगाव, गांधीसागर व पांढराबोडी या तलावांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाची मंजुरी प्राप्त आहे. या अंतर्गत सोनेगाव व गांधीसागर तलावांसाठी राज्य शासनाने २९.३२ कोटींचा निधी दिला आहे. तर अंबाझरी व फुटाळा तलाव मोठे असल्याने राज्य शासनाने शिफारस करून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत या तलावांचे प्रस्ताव पाठविले आहेत. परंतु यात महापालिकेला आपला वाटा उचलावा लागेल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका