शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

एककल्ली राजकारणामुळे विदर्भाचा विषय बाजूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:00 IST

सध्या दिल्लीत नरेंद्र  मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे : विदर्भ कनेक्टतर्फे स्वतंत्र विदर्भाचे ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्या दिल्लीत नरेंद्र  मोदी आणि अमित शहा यांचे एककल्ली राजकारण सुरू आहे. ते कुणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला पडला आहे, असे मत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.‘विष्णूजी कि रसोई’ येथे विदर्भ कनेक्टद्वारे आयोजित विदर्भाचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजपचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वेगळ्या विदर्भाबाबतच्या भूमिकेबाबत शंका नाही पण, दिल्लीच्या राजकारणाचीस्थिती अशी आहे की मोदी आणि शहा हे भाजपाच्या कुठल्याही नेत्याचे ऐकत नाहीत. या स्थितीत गडकरी आणि फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी कितीही आग्रह धरला तरी मोदी-शहा जोडी त्याकडे लक्ष देणार नाही. कारण काही का असेना पण भाजपाने विदर्भाचे वेगळे राज्य देण्याचे आपले आश्वासन पाळले नाही ही वस्तुस्थिती आहे. पण त्यामुळे काँग्रेस विदर्भाचे वेगळे राज्य देईल, अशी आशा करणे चूक आहे. याबाबत काँग्रेसने आधीच आपली फसवणूक केली आहे. त्यामुळे विदर्भातील कोणताही पक्ष वेगळ्या विदर्भासाठी आपल्याला मदत करेल या भरोशावर राहण्यात काही अर्थ नाही. विदर्भवादी संघटनांना स्वत:ची राजकीय शक्ती निर्माण करून, विदर्भ राज्य पक्ष निर्माण करूनच विदर्भ राज्य मिळेल, हे लक्षात घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागावे असे प्रतिपादन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.प्रास्ताविक अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी केले. संदेश सिंगलकर, तेजिंदरसिंग रेणू, दिनेश नायडू, विष्णू मनोहर, माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, माजी पोलीस आयुक्त प्रबीरकुमार चक्रवर्ती, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, हरिभाऊ केदार, प्रफुल्ल मनोहर, मिलिंद देशकर, अ‍ॅड. तुषार मंडलेकर, अ‍ॅड. चंद्रकांत समर्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, चंचलसिंग रेणू, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, दुर्गाप्रसाद अग्रवाल, अ‍ॅड. शैलेंद्र हारोडे, अ‍ॅड.सुरेंद्र  पारधी, अ‍ॅड. नंदा पराते, डॉ. उदय बोधनकर, धनंजय धार्मिक, नितीन रोंघे, दिलीप नरवाडिया, प्रदीप महेश्वरी, अण्णाजी राजेधर, माजी आमदार यादवराव देवगडे, रवी संन्याल, श्रीनिवास खांदेवाले, प्रा. रिना शहा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन