शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भावी सरपंचांच्या स्वप्नांना लागला ब्रेक; ३ जुलैला नव्याने आरक्षण निघणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:00 IST

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण मान्य केल्याने राज्यात ओबीसींची सरपंच पदे वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : गत दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निघाले. त्यानुसार इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून कामाला लागले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पुन्हा नव्याने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचे आदेश शासनाकडून धडकल्याने सरपंच बनू इच्छिणाऱ्यांच्या स्वप्नांना तूर्तास ब्रेक लागला आहे. आता नव्याने ३ जुलै रोजी निघणाऱ्या आरक्षण सोडतीत संधी मिळेल की नाही? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा ठाकला आहे.

गत एप्रिल महिन्यात २०२५ ते २०३० कालावधीकरिता राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्याचवेळी ग्रामविकास विभागाने २०३० पर्यंत कार्यकाल संपणाऱ्या सरपंच पदाचा राज्याचा कोटा निश्चित केला होता. त्यानुसार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत, २२ एप्रिल रोजी काढण्यात आली. लागलीच सरपंच पदाचे इच्छूक आपापल्या गावात कामालाही लागले.

मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण मान्य केल्याने राज्यात ओबीसींची सरपंच पदे वाढणार आहेत. ग्रामविकास विभागाने मार्च २०२५मध्ये अधिसूचना काढून २६.०४ टक्के यानुसार ओबीसींचे सरपंच पदाचे कमी आरक्षण जिल्ह्यांना दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे २७टक्के आरक्षण मान्य केले आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने दिलेले पूर्वीचे सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाले आहे. आता ओबीसींच्या सरपंच पदाच्या वाढीव कोट्यासह पुन्हा आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व तहसीलदारांना दिले असून, या नव्या बदलानुसार खुल्या प्रवर्गात गेलेली ओबीसींची सरपंचपदे ही पुन्हा ओबीसी प्रवर्गात येण्याची शक्यता आहे. 

राजकीय गणिते बदलणारगत २२ एप्रिल रोजी भिवापूर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत निघाली. आता पुन्हा नव्याने ३ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्यामुळे तालुक्यातील आणि गावगाड्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. सध्याच्या आरक्षणामुळे उत्साहीत झालेल्या भावी सरपंचाच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.

"सन २०२५ ते २०३० कालावधीकरिता तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत, येत्या ३ जुलै रोजी भिवापूर तहसील कार्यालय येथे दुपारी १२:१५ मिनिटांनी होणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार ही सोडत काढली जाणार आहे."- कल्याणकुमार डहाट, तहसीलदार, भिवापूर

 

टॅग्स :nagpurनागपूरgram panchayatग्राम पंचायत