शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपूर स्टेशनवर नाट्यपूर्ण क्षण : घरच्यांच्या रागाच्या भीतीने पळून निघालेल्या मुली परतल्या

By नरेश डोंगरे | Updated: July 24, 2025 20:00 IST

आरपीएफकडून वेळीच मिळाली मदत : अन्यथा झाला असता घात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिस्थितीमुळे झालेली कोंडी फोडण्यासाठी 'त्या' चाैघी एका 'सिनियर'च्या आधाराने मुंबईकडे निघाल्या. मात्र, मानसिक अस्वस्था चांगली नसल्याने त्या नागपुरातच उतरल्या. वेळीच त्यांना आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी हेरले. परिणामी त्या पुन्हा त्यांच्या कुटुंबियांमध्ये सुखरूप परतू शकल्या.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या युवतीची ही कथा आहे. यातील चार जणी १६ ते १७ वयोगटातील आहेत. परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्ध्यावर सुटलेले. कुटुंबियांची आर्थिक अवस्था बिकट असल्याने त्यांनाही उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागते. गावातील अन्य मुली छान-छाैकीने राहतात, फिरतात. आपल्याला काहीच मिळत नाही. शिवाय कुठे फिरायलाही जाता येत नाही, अशी खंत वाटत असल्याने त्या चाैघी एकमेकींसमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या. त्यांच्यात सिनियर (सज्ञान) असलेली संजना (नाव काल्पनिक) हिच्याशी बोलताना त्या आपली मानसिक कोंडी होत असल्याचे सांगायच्या. दोन दिवसांपूर्वी अशाच गप्पा करताना घुसमट कमी करण्यासाठी त्यांनी जवळच्या एका दर्शनीय ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनविली. त्यानुसार, २२ जुलैला त्या चाैघी आणि संजना अशा पाच जणी गावातून बाहेर पडल्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरी परत येऊ, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, पहिल्यांदाच निघाल्यामुळे त्यांनी तिकडे फिरण्या-बागडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यामुळे त्यांना रात्र झाली. आता घरी गेल्यानंतर कुटुंबिय नको तो संशय घेऊन रागावतील, मारतील, अशी भिती त्यांना वाटू लागली. परिणामी त्यांनी 'स्टँडिंग प्लॅन' बनवित मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुर्ग स्थानकावर उभी असलेल्या गाडीत बसून त्या नागपूररेल्वे स्थानकावर उतरल्या. येथे मात्र, त्यांची अस्वस्थता अधिक तीव्र झाली. त्यामुळे उर्सनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्याजवळ थांबल्या. त्यांची सैरभैर अवस्था लक्षात घेत आरपीएफचे व्ही. पी. सिंग, अंमलदार मंजू शर्मा, जुमा इंगळे यांनी त्यांची विचारपूस सुरू केली.

पलायन नाट्यानंतर घरवापसीचार अल्पवयीन मुलींसह पाच जणींची पलायन कथा माहिती झाल्यानंतर आरपीएफचे निरीक्षक यादव यांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने नमूद पाचही जणींच्या पालकांशी संपर्क केला. त्यानंतर त्यांची रवानगी शासकीय मुलींच्या वस्तीगृहात करण्यात आली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्यांचे पालक नागपुरात पोहचले. कायदेशिर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. अशा पद्धतीने आरपीएफमुळे या मुलींची सुखरूप घरवापसी झाली.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे