शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
5
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
6
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
7
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
8
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
11
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
12
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
13
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
14
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
15
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
16
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
17
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
18
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
19
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू

नागपूर स्टेशनवर नाट्यपूर्ण क्षण : घरच्यांच्या रागाच्या भीतीने पळून निघालेल्या मुली परतल्या

By नरेश डोंगरे | Updated: July 24, 2025 20:00 IST

आरपीएफकडून वेळीच मिळाली मदत : अन्यथा झाला असता घात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिस्थितीमुळे झालेली कोंडी फोडण्यासाठी 'त्या' चाैघी एका 'सिनियर'च्या आधाराने मुंबईकडे निघाल्या. मात्र, मानसिक अस्वस्था चांगली नसल्याने त्या नागपुरातच उतरल्या. वेळीच त्यांना आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी हेरले. परिणामी त्या पुन्हा त्यांच्या कुटुंबियांमध्ये सुखरूप परतू शकल्या.

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या युवतीची ही कथा आहे. यातील चार जणी १६ ते १७ वयोगटातील आहेत. परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्ध्यावर सुटलेले. कुटुंबियांची आर्थिक अवस्था बिकट असल्याने त्यांनाही उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करावी लागते. गावातील अन्य मुली छान-छाैकीने राहतात, फिरतात. आपल्याला काहीच मिळत नाही. शिवाय कुठे फिरायलाही जाता येत नाही, अशी खंत वाटत असल्याने त्या चाैघी एकमेकींसमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या. त्यांच्यात सिनियर (सज्ञान) असलेली संजना (नाव काल्पनिक) हिच्याशी बोलताना त्या आपली मानसिक कोंडी होत असल्याचे सांगायच्या. दोन दिवसांपूर्वी अशाच गप्पा करताना घुसमट कमी करण्यासाठी त्यांनी जवळच्या एका दर्शनीय ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनविली. त्यानुसार, २२ जुलैला त्या चाैघी आणि संजना अशा पाच जणी गावातून बाहेर पडल्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरी परत येऊ, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, पहिल्यांदाच निघाल्यामुळे त्यांनी तिकडे फिरण्या-बागडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यामुळे त्यांना रात्र झाली. आता घरी गेल्यानंतर कुटुंबिय नको तो संशय घेऊन रागावतील, मारतील, अशी भिती त्यांना वाटू लागली. परिणामी त्यांनी 'स्टँडिंग प्लॅन' बनवित मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुर्ग स्थानकावर उभी असलेल्या गाडीत बसून त्या नागपूररेल्वे स्थानकावर उतरल्या. येथे मात्र, त्यांची अस्वस्थता अधिक तीव्र झाली. त्यामुळे उर्सनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्याजवळ थांबल्या. त्यांची सैरभैर अवस्था लक्षात घेत आरपीएफचे व्ही. पी. सिंग, अंमलदार मंजू शर्मा, जुमा इंगळे यांनी त्यांची विचारपूस सुरू केली.

पलायन नाट्यानंतर घरवापसीचार अल्पवयीन मुलींसह पाच जणींची पलायन कथा माहिती झाल्यानंतर आरपीएफचे निरीक्षक यादव यांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने नमूद पाचही जणींच्या पालकांशी संपर्क केला. त्यानंतर त्यांची रवानगी शासकीय मुलींच्या वस्तीगृहात करण्यात आली. दरम्यान, बुधवारी सायंकाळी त्यांचे पालक नागपुरात पोहचले. कायदेशिर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. अशा पद्धतीने आरपीएफमुळे या मुलींची सुखरूप घरवापसी झाली.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे