शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

नागपुरातील आदिवासी वसतिगृहात गटारचे पाणी; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 10:49 IST

कळमना परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षभरापासून गटारलाईन चोक झाल्यामुळे गटारीचे पाणी वसतिगृह परिसरात साचले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिला विभागाच्या कार्यालयापुढे ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षभरापासून गटारलाईन चोक झाल्यामुळे गटारीचे पाणी वसतिगृह परिसरात साचले आहे. विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागापासून एनआयटीपर्यंत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या दिला.राज्यभरातून शिक्षणासाठी नागपुरात आलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. सध्या २८६ विद्यार्थी येथे वास्तव्यास आहे. वसतिगृहाची गटारलाईन चोक झाल्यामुळे वसतिगृह परिसरात पसरलेल्या घाणीमुळे विद्यार्थी त्रस्त आहे. घाण पाण्यामुळे वसतिगृहात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे.विद्यार्थी आजारी पडायला लागले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या सभोवताली गटारीच्या पाण्याची घाण पसरली आहे. गेल्या वर्षभरापासून वसतिगृहात ही समस्या आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एनआयटीचे अधीक्षक अभियंता, मनपाचे आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग, यांच्यासह आदिवासी विभागाच्या सचिवांनासुद्धा या समस्येसंदर्भात अवगत केले आहे. पण विद्यार्र्थ्यांच्या आरोग्याचा हा भीषण प्रश्न कुणीही सोडविला नाही. नुकतीच या वसतिगृहाला प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीच्या सदस्यांनी भेट दिली. वसतिगृहाची दुरवस्था बघून संताप व्यक्त केला.समितीचे सदस्य व आदिवासी विद्यार्थी संघाचे संघटक सचिव शिवकुमार कोकाडे यांच्या नेतृत्वात मंगळवारी विद्यार्थ्यांनी समस्या सोडविण्यासाठी अप्पर आयुक्त आदिवासी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलनात जितेंद्र धानगुणे, विलास उईके, मनोज कोथळे, गणेश इडपाचे, जितेंद्र अडमाची, सुनील भलावी आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

वसतिगृह वाऱ्यावर३.५ कोटी रुपये खर्चून वसतिगृहाचे बांधकाम केले आहे. २०१४ मध्ये वसतिगृह सुरू झाल्यापासूनच छोटेमोठे प्रॉब्लेम सुरू झाले आहे. वसतिगृहात टाकलेली गटारलाईन निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे गटार चोक होऊन घाण पाणी वसतिगृह परिसरात पसरले आहे. वसतिगृहात थांबू शकत नाही, अशी अवस्था आहे. प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण यांना कित्येक तक्रारी केल्या आहे. वसतिगृहाच्या वॉर्डनने समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतरही प्रकल्प अधिकारी त्यांच्यावर दबाव आणत आहे. कायापालट समितीलाही या समस्येबद्दल अवगत केले होते. पण कुणाचेच लक्ष नाही, वसतिगृह वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था असल्याची ओरड विद्यार्थ्यांची आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य