शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डॉ. तायवाडे यांना धमक्यांचे फोन, न घाबरण्याचा निर्धार; सरकारशी चर्चेत २२ मागण्या मान्य; आंदोलन मागे

By कमलेश वानखेडे | Updated: September 30, 2023 21:02 IST

चंद्रपूर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने २२ मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. 

नागपूर : ओबींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवांडे यांना धमक्यांचे फोन येऊ  लागले आहेत. अजूनही फोन द्वारे धमकी देणे सुरू आहे. गरज भासली तर त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करेल, असे डॉ. तायवाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

चंद्रपूर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून सरकारने २२ मागण्या मान्य केल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. 

तायवाडे म्हणाले, सरकार सोबतच्या बैठकीचे  मिनिट्स आणि रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. त्यामुळे कुणी शंका घेण्याचे कारण नाही. चंद्रपूर मधील उपोषण सोडविण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. सरकारने दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील असा विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरातील आंदोलन सुद्धा स्थगित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

तीन आठवड्यांच्या आंदोलनाच्या काळात मी जे काही सार्वजनिक रित्या किंवा प्रसारमाध्यमांसमोर बोललो, त्याचा वेगळा अर्थ लावून काही लोक धमकीचे फोन करत आहेत. गरज भासली तर त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करेल. जेव्हा माणूस समाजासाठी समर्पित असतो तेव्हा अशा धमक्यांना घाबरायचे नसते. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. आम्ही संवैधानिक अधिकाराची लढाई लढत आहोत. ही लढाई मरेपर्यंत लढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणnagpurनागपूरGovernmentसरकार