शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डीपीसीला ४०० कोटी रूपये मिळणार : पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:48 IST

महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४१.८६ कोटीवरून ४०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला न्याय दिला असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

ठळक मुद्देभाजप दिशाभूल करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने नागपूर जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२०-२१ या वर्षाकरिता २४१.८६ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला होता. सदर निधी नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या तुलनेने कमी आल्यामुळे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अधिकच्या निधीची मागणी केली. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४१.८६ कोटीवरून ४०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला न्याय दिला असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.जिल्हा वार्षिक योजनेबाबत नियोजन करताना जिल्ह्यातील लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारे दरवर्षी शासनाकडून विकास निधीत सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली जाते. भाजपा सत्तेत असतांना त्यांनी नियमांची पायमल्ली केली. सन २०१४-१५ या वर्षामध्ये नागपूर जिल्ह्याकरिता २२५ कोटी निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. तद्नंतर या निधीत सन २०१५-१६ या वर्षामध्ये ३७.७५ टक्क्यांनी वाढ करून जिल्ह्याकरिता ३१२.७५ कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पीय तरतूद केली. सन २०१६-१७ मध्ये या टक्केवारीत घट करून ३५० कोटी निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली.सन २०१९-२० या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला भाजपाकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने सदर निधीत ५२.१६ टक्क्यांनी वाढ करून ५२५.१६ कोटी निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. एकूणच भाजप या मुद्यावर जनतेची दिशाभूल करीत असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतGovernmentसरकारfundsनिधी