शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

लोकांना बेघर करून प्रकल्प राबवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरात नागरिकांनी २० ते २५ वर्षापूर्वी सातबारा संबंधित जमीनमालकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरात नागरिकांनी २० ते २५ वर्षापूर्वी सातबारा संबंधित जमीनमालकांच्या नावाने असल्याने या परिसरात भूखंड खरेदी करून घरे बांधली. यात आपल्या आयुष्याची कमाई खर्च केली. निवासी भाग वगळून भारतीय क्रीडा प्राधिकरणला (साई) जागा हस्तांतरित करा. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण लोकांना बेघर करू नका, अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी शुक्रवारी ऑनलाइन मनपा सभागृहात घेतली.

नगरसेवक संजय महाकाळकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. कृषी विभागाने १९६९ मध्ये मौजा वाठोडा, तरोडी (खुर्द) परिसरातील जमीन महापालिकेला हस्तांतरित केली. मात्र मागील ४५ ते ५० वर्षांत महापालिका प्रशासनाने फेरफार करून सातबारावर आपले नाव चढवले नव्हते. मूळ मालकाच्या नावाने जमीन असल्याने त्यांनी ती भूखंडधारकांना विकली. यात भूखंडधारकांचा कोणताही दोष नाही. त्यांना आता बेघर करता येणार नाही. तसेच शासनाच्या जागेवर वसलेल्यांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने वेळोवेळी घेतला आहे. एप्रिल २०११ मध्ये माजी आमदार चंद्रशेखर बावनकुुळे, सुधीर पारवे, विजय घोडमारे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून ही जमीन आरक्षण मुक्त करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे माजी अध्यक्षांनी जमीन अधिग्रहण संदर्भात भूखंडधारकांचे आक्षेप व तक्रारी मागविण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती महाळाकर यांनी दिली. जमीन मनपाच्या नावावर न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेविका आभा पांडे यांनीही मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरातील नागरिकांना बेघर न करता प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी केली. नागरिकांनी महसूल विभागाचे रेकॉर्ड बघून भूखंड खरेदी केले. आता या जागेवर मनपा आपला दावा करीत आहे. आजवर ही जागा मनपाने आपल्या नावावर का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

.....

भूखंडधारकांनी समितीकडे तक्रार करावी

साईला हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीवर जे लोक वास्तव्य करीत आहेत, त्यांनी महिनाभरात त्यांची मालकी सिद्ध होते. असे शासकीय दस्तावेजासह मनपाद्वारे निर्धारित समितीकडे तक्रार करावी. यासाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि स्थावर विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच तक्रारीचे निराकरण करून पाच एकर जागेमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.