शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

लोकांना बेघर करून प्रकल्प राबवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरात नागरिकांनी २० ते २५ वर्षापूर्वी सातबारा संबंधित जमीनमालकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरात नागरिकांनी २० ते २५ वर्षापूर्वी सातबारा संबंधित जमीनमालकांच्या नावाने असल्याने या परिसरात भूखंड खरेदी करून घरे बांधली. यात आपल्या आयुष्याची कमाई खर्च केली. निवासी भाग वगळून भारतीय क्रीडा प्राधिकरणला (साई) जागा हस्तांतरित करा. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण लोकांना बेघर करू नका, अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी शुक्रवारी ऑनलाइन मनपा सभागृहात घेतली.

नगरसेवक संजय महाकाळकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. कृषी विभागाने १९६९ मध्ये मौजा वाठोडा, तरोडी (खुर्द) परिसरातील जमीन महापालिकेला हस्तांतरित केली. मात्र मागील ४५ ते ५० वर्षांत महापालिका प्रशासनाने फेरफार करून सातबारावर आपले नाव चढवले नव्हते. मूळ मालकाच्या नावाने जमीन असल्याने त्यांनी ती भूखंडधारकांना विकली. यात भूखंडधारकांचा कोणताही दोष नाही. त्यांना आता बेघर करता येणार नाही. तसेच शासनाच्या जागेवर वसलेल्यांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने वेळोवेळी घेतला आहे. एप्रिल २०११ मध्ये माजी आमदार चंद्रशेखर बावनकुुळे, सुधीर पारवे, विजय घोडमारे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून ही जमीन आरक्षण मुक्त करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे माजी अध्यक्षांनी जमीन अधिग्रहण संदर्भात भूखंडधारकांचे आक्षेप व तक्रारी मागविण्याचे निर्देश दिले होते, अशी माहिती महाळाकर यांनी दिली. जमीन मनपाच्या नावावर न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेविका आभा पांडे यांनीही मौजा वाठोडा व तरोडी खुर्द परिसरातील नागरिकांना बेघर न करता प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी केली. नागरिकांनी महसूल विभागाचे रेकॉर्ड बघून भूखंड खरेदी केले. आता या जागेवर मनपा आपला दावा करीत आहे. आजवर ही जागा मनपाने आपल्या नावावर का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.

.....

भूखंडधारकांनी समितीकडे तक्रार करावी

साईला हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीवर जे लोक वास्तव्य करीत आहेत, त्यांनी महिनाभरात त्यांची मालकी सिद्ध होते. असे शासकीय दस्तावेजासह मनपाद्वारे निर्धारित समितीकडे तक्रार करावी. यासाठी अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि स्थावर विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच तक्रारीचे निराकरण करून पाच एकर जागेमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.