शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एनएमआरडीए क्षेत्रातील लघु उद्योगांना त्रास देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

नागपूर : नागपूर मेट्रो महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रात वर्षांपासून सुरू असलेल्या उद्योगांना त्रास देण्यात येत आहे. या क्षेत्रातील ...

नागपूर : नागपूर मेट्रो महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रात वर्षांपासून सुरू असलेल्या उद्योगांना त्रास देण्यात येत आहे. या क्षेत्रातील उद्योग शासनाच्या नियमानुसार स्थापन करून सुरू आहेत. पण एनएमआरडीएच्या धोरणानुसार त्यात तर्कसंगत नसलेले विविध बदल उद्योगांना करण्यास सांगण्यात येत आहेत. त्यांना नोटिसा देण्यात येऊन बांधकाम तोडण्याची धमकीसुद्धा देण्यात येत आहे. हे चुकीचे असून या संदर्भात चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात एका प्रतिनिधी मंडळाने नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी आ. विकास ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि विस्तृत माहिती दिली.

दीपेन अग्रवाल म्हणाले, लोकांनी परिश्रमाने शहराच्या चारही बाजूला लघु उद्योग स्थापन केले असून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एनएमआरडीए या उद्योगांना अनधिकृत सांगत आहे. पण सत्य बाब अशी की, राज्य शासनाच्या कायद्यानुसार हे उद्योग स्थापन झाले आहेत. जर डीसीआर बनण्यात आणि तो लागू होण्यास विलंब झाला असेल तोपर्यंत उद्योजक उद्योग सुरू करणे थांबविणार नाही.

प्रमोद अग्रवाल म्हणाले, पूर्वी मनपा सीमेच्या पाच किमी टप्पा मेट्रोपॉलिटिन क्षेत्रात आणण्याची योजना होती. नंतर हा टप्पा १० किमी आणि आता २५ किमी केला आहे. सन २०१० मध्येच नवीन डीसीआर लागू होणार होता, पण तो २०१८ मध्ये लागू करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने आठ वर्षांचा विलंब झाला. तोपर्यंत उद्योजकांना थांबणे शक्य नव्हते.

अशोक आहुजा म्हणाले, एका सर्वेक्षणानुसार १३ टक्के उद्योग १९९९ पूर्वी, ४६ टक्के उद्योग २००० ते २०१२ दरम्यान स्थापन झाले आहेत. २६ टक्के उद्योग २०१३ ते २०१५ दरम्यानचे आहेत. अशा स्थितीत नवीन कायदे लागू करण्याची अपेक्षा कशी करता येईल. नवीन योजना २०१२ ते २०३२ करिता आहे.

दिलीप ठकराल म्हणाले, नवीन एनए आणि बिल्डिंग प्लॅनकरिता नियमानुसार सर्व परवानगी सरकारी कार्यालयाकडून घेतल्या आहेत. तेव्हा ते अधिकृत होते. त्यात उद्योजक आणि व्यापाऱ्यांची चुकी काय? इतकेच नव्हे तर मंजुरीच्या आधारावर विक्री कर विभाग, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, फॅक्ट्री इन्स्पेक्टर, जिल्हा उद्योग केंद्र, बँक आणि अन्य वित्तीय संस्थांनी मान्यता दिली आहे. आता एनएमआरडीएचे अधिकारी याला अनधिकृत समजत नाहीत. यावेळी नटवर पटेल, गिरीश लीलाधर आणि संजय के अग्रवाल यांनी आपले विचार मांडले. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मांडणार असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.