शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

एनएमआरडीए क्षेत्रातील लघु उद्योगांना त्रास देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST

नागपूर : नागपूर मेट्रो महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रात वर्षांपासून सुरू असलेल्या उद्योगांना त्रास देण्यात येत आहे. या क्षेत्रातील ...

नागपूर : नागपूर मेट्रो महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रात वर्षांपासून सुरू असलेल्या उद्योगांना त्रास देण्यात येत आहे. या क्षेत्रातील उद्योग शासनाच्या नियमानुसार स्थापन करून सुरू आहेत. पण एनएमआरडीएच्या धोरणानुसार त्यात तर्कसंगत नसलेले विविध बदल उद्योगांना करण्यास सांगण्यात येत आहेत. त्यांना नोटिसा देण्यात येऊन बांधकाम तोडण्याची धमकीसुद्धा देण्यात येत आहे. हे चुकीचे असून या संदर्भात चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात एका प्रतिनिधी मंडळाने नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी आ. विकास ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि विस्तृत माहिती दिली.

दीपेन अग्रवाल म्हणाले, लोकांनी परिश्रमाने शहराच्या चारही बाजूला लघु उद्योग स्थापन केले असून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एनएमआरडीए या उद्योगांना अनधिकृत सांगत आहे. पण सत्य बाब अशी की, राज्य शासनाच्या कायद्यानुसार हे उद्योग स्थापन झाले आहेत. जर डीसीआर बनण्यात आणि तो लागू होण्यास विलंब झाला असेल तोपर्यंत उद्योजक उद्योग सुरू करणे थांबविणार नाही.

प्रमोद अग्रवाल म्हणाले, पूर्वी मनपा सीमेच्या पाच किमी टप्पा मेट्रोपॉलिटिन क्षेत्रात आणण्याची योजना होती. नंतर हा टप्पा १० किमी आणि आता २५ किमी केला आहे. सन २०१० मध्येच नवीन डीसीआर लागू होणार होता, पण तो २०१८ मध्ये लागू करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने आठ वर्षांचा विलंब झाला. तोपर्यंत उद्योजकांना थांबणे शक्य नव्हते.

अशोक आहुजा म्हणाले, एका सर्वेक्षणानुसार १३ टक्के उद्योग १९९९ पूर्वी, ४६ टक्के उद्योग २००० ते २०१२ दरम्यान स्थापन झाले आहेत. २६ टक्के उद्योग २०१३ ते २०१५ दरम्यानचे आहेत. अशा स्थितीत नवीन कायदे लागू करण्याची अपेक्षा कशी करता येईल. नवीन योजना २०१२ ते २०३२ करिता आहे.

दिलीप ठकराल म्हणाले, नवीन एनए आणि बिल्डिंग प्लॅनकरिता नियमानुसार सर्व परवानगी सरकारी कार्यालयाकडून घेतल्या आहेत. तेव्हा ते अधिकृत होते. त्यात उद्योजक आणि व्यापाऱ्यांची चुकी काय? इतकेच नव्हे तर मंजुरीच्या आधारावर विक्री कर विभाग, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, फॅक्ट्री इन्स्पेक्टर, जिल्हा उद्योग केंद्र, बँक आणि अन्य वित्तीय संस्थांनी मान्यता दिली आहे. आता एनएमआरडीएचे अधिकारी याला अनधिकृत समजत नाहीत. यावेळी नटवर पटेल, गिरीश लीलाधर आणि संजय के अग्रवाल यांनी आपले विचार मांडले. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मांडणार असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.