शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

श्वानांचे हल्ले वाढले; मुलं ‘सॉफ्ट टार्गेट’ का ठरत आहेत?

By निशांत वानखेडे | Updated: August 18, 2025 16:07 IST

मोठ्यांची श्वानांसोबत टवाळी चिमुकल्यांवर बेतते: मुलांना कसे सुरक्षित ठेवाल?

निशांत वानखेडेनागपूर : शनिवारी नागपुरात एका पाच वर्षाच्या मुलीवर चार-पाच स्वानांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. तीन दिवसांपूर्वी अशीच घटना वहगाव, मावळ येथे घडली. गेल्या वर्षीच नागपूर जिल्ह्याच्या काटोल येथे श्वानांच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला प्राण गमवावे लागले. या गंभीर घटनांमुळे पालकांची चिंता वाढवली आहे. त्याचा एकूणच रोष स्वानांवर व्यकत होती. भारतात दरवर्षी श्वानांचे हल्ले व चावा घेतल्याने होणान्या रेबिज आजारामुळे १८ ते २० हजार लोकांचा मृत्यू होतो, ज्यामध्ये मूलांची संख्या अधिक असते. यामुळे श्वान लहान मुलांना 'टार्गेट' करतात का? कारण काय? श्वानांच्या कर्तणुकीत काही चदल झालेत काय, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मोठ्यांची श्वानांसोबत टवाळी चिमुकल्यांवर बेतते: मुलांना कसे सुरक्षित ठेवाल?प्रशासन गंभीर नाही तज्ज्ञांच्या मते यामध्ये महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हे गंभीर कारण आहे. प्रशासनाकडून प्रामाणिकपणे नसबंदी केली जात नाही, स्वानांचे लसीकरण होत नाही. त्यामुळे मोकाट स्वानांची संख्या भरमसाट वाढली आहे. संख्या नियंत्रणात नसल्याने अन्न तुटवडा व हल्ले वाढले आहेत. उपाय म्हणून एका परिसरातील स्वान दुसन्या भागात सोडणे, वामुळेसुद्धा त्यांच्यात आक्रमकता व अनैसर्गिक वर्तणूक तयार होत आहे.

प्रजननाच्या काळात श्वान आक्रमक होतातपशु चिकित्सक डॉ. पोहरकर यांनी सांगितले, हा सध्या श्वानांच्या प्रजननाचा काळ आहे. अशात ८-१० श्वान झुडीने वावरत असतात. या स्थितीत त्यांची उपासमार होत असते, ज्यामुळे ते चिडचिड करतात, आक्रमक होतात, मानसिक संतुलनावर परिणाम होतो. अशा वेळी लहान मुले कुत्रे पाहून भीतीपोटी पळण्याचा प्रयत्न करतात, घाबरतात, ही वर्तणूक श्वानांना आणखी आक्रमक करते व ते मुलांवर हल्ले करतात. प्रतिकार न करणारी मुले त्यांच्यासाठी 'सॉफ्ट टार्गेट' ठरतात. सर्वच श्वान नाही, पण एखादा आक्रमक असतो व इतर त्याचे अनुकरण करतात.

अन्नाअभावी चिडचिड, आक्रमकतामोकाट श्वानांची संख्या वाढली आहे. पूर्वीसारखे त्यांना खायला अन्न मिळत नाही. त्यांची शिकार करण्याची सवयही सुटत चालली आहे. काही कुत्र्यांच्या मनात धावणाऱ्या मुलांचे ओरडणे हे 'शिकार'सारखे असते व ते हमना करतात, असे डॉ. पोहस्कर यांनी सांगितले. खरूज किवा इतर आजारांमुळे त्यांच्यात चिडचिडपणा येतो व ते आक्रमक होतात,

मानवी वर्तणूक गंभीर कारणमहाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. पोहरकर यांच्या मते स्वानांच्या आक्रमकपणामागे मानवी वर्तणूक मोठे कारण आहे. तरुणांकडून स्थानांशी छेडछाड केली जाते. विविध प्रकारची खोडी केली आते. वाहनचालक मुद्दामपणे स्वानांना थडक देतात, लाथ मारतात, दुकानदारांकडूनही गरम तेल किंवा गरम पाणी त्याच्या अंगावर टाकण्याचे प्रकारही बघायला मिळतात. अशा घृणास्पद प्रकारामुळे श्वानांच्या मनात विशिष्ट वाहन, व्यक्तिबद्दल आक्रमकता निर्माण होते. ते सारख्या दिसणाऱ्या वाहनांवर धावून जातात. ही वर्तणूक लहान मुलांच्या जीवावर बेतते.

मुलांना सांभाळणे, जनजागृती हाच पर्यायस्वानांचे हल्ले रोखण्यासाठी जनजागृती हाच सर्वात मोठा पर्याय आहे. शाळांमध्ये मुलांची जागृती करणे, त्यांना प्राण्यांशी वागणुकीबाबत जागरूक यारणे महत्त्वाचे आहे. मोठ्यांनी श्वानांशी अनैसर्गिक वर्तणूक करू नये, कारण त्याचे परिणाम मुलांना भोगावे लागतात. विशेषतः तीन-चार वर्षांची मुले असलेल्या पालकांनी मुलांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रशासनाने नियमित लसीकरण व नसबंदी करून श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवावी.

टॅग्स :nagpurनागपूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdogकुत्रा