पाण्याची नासाडी नकोच

By Admin | Updated: April 21, 2016 03:09 IST2016-04-21T03:09:17+5:302016-04-21T03:09:17+5:30

तापमान वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच शहरालगतच्या भागातील नागरिकांना मागणी करूनही टँकर वेळेवर मिळत नाही.

Do not waste the water | पाण्याची नासाडी नकोच

पाण्याची नासाडी नकोच

महापौरांचे निर्देश नागरिकांना पाणी द्या कारवाईचा इशारा
नागपूर : तापमान वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच शहरालगतच्या भागातील नागरिकांना मागणी करूनही टँकर वेळेवर मिळत नाही. दुसरीकडे टँकरची गळती व ठिकठिकाणी सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने होत असलेल्या पाण्याचा अपव्यय रोखा व नागरिकांना पाणी द्या, असे निर्देश देत याचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी जलप्रदाय विभागाच्या तातडीच्या आढावा बैठकीत दिला.

नळाला तोट्या नसल्याने व टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना होणाऱ्या पाण्याच्या नासाडीसंदर्भात ‘लोकमत’च्या बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित होताच महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याची दखल घेत दटके यांनी जलप्रदाय विभागाची तातडीची आढावा बैठक बोलावली होती.




शहरात ३१० टँकर सुरू आहेत. परंतु मागणी करूनही वेळेवर टँकर मिळत नाही. पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने दोन दिवसांपूर्वी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी पाण्यासाठी माठ फोडून आपला रोष व्यक्त केला होता. भाजप नगरसेवकांना आंदोलन करता येत नाही पण त्यांच्याही तक्रारी आहेत. बैठकीला स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त नयना गुंडे, अधीक्षक अभियंता शशिकांत हस्तक यांच्यासह झोनचे सहाय्यक आयुक्त, जलप्रदाय व ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.

ंकोणत्या झोनला किती टँकरची गरज आहे. याचा झोननिहाय आढावा घेण्यात आला. नळाचे नेटवर्क नसलेल्या भागातील नागरिकांची मागणी असल्यास टँकर उपलब्ध करा. नागरिकांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश दटके यांनी दिले.

Web Title: Do not waste the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.