शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

न्यायालयाची वाट पाहू नका, कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:45 AM

नागपुरात झालेल्या हुंकार सभेत मोहन भागवत यांची मागणी

नागपूर : कोणताही देश हा केवळ कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो. सध्या राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयासाठी प्राधान्यक्रम नसल्याचे दिसत आहे. न्यायालयाकडून याबाबतचा निर्णय सातत्याने पुढे ढकलला जात असून न्याय देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, संसदेत कायदा करावा व अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.

रविवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे ‘हुंकार सभा’ झाली. सभेत वासुदेवानंद सरस्वती शंकराचार्य, साध्वी ऋतंभरा, नाथपीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार आदींनी राम मंदिर उभारणीची एकमुखी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय देण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगत न्यायालयाच्या भूमिकेवर नाराजीही व्यक्त केली.

मोहन भागवत म्हणाले, अयोध्येत राम मंदिर नाही हे पाहून मनाला वेदना होतात. राम मंदिराबाबत हिंदू समाजाची बाजू सत्य आणि न्यायाची आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी टाळून सत्य टाळले जात आहे. न्याय उशिरा मिळणे म्हणजेच तो एकप्रकारे नाकारणेच होय, अशी नाराजी व्यक्त करीत मंदिर बनले तर सर्व वाद मिटतील, असा दावाही त्यांनी केला. पेच कायदेशीर मार्गाने सुटेल, यासाठी बराच धीर धरला. आता मात्र, राममंदिर आंदोलनालचा हा निर्णायक टप्पा आहे. आता धैर्याचे काम नाही. जनआंदोलनाची गरज आहे. त्यासाठी जनतेत जाऊन जनजागरण करा. कायद्याची मागणी करा. मंदिराचे काम सुरू झाल्यावरच थांबा. राजकारणाचा विचार करू नका. सरकारवर दबाव निर्माण करा. सरकार झुकेल, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवत