शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

सरकारी देणे भरू नका : शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल : तुरुंगात टाकाल तर उखडून फेकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 8:41 PM

बळीराजा संकटात असताना सरकारने कर्जमाफीची रक्कम दिली नाही. शेतमलाला किंमत दिली नाही. कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे आता सरकारचे कुठलेही देणे भरणार नाही, विजेचे बिलही भरणार नाही, असा निर्णय घ्या. या मोर्चातून गेल्यावर घरोघरी जाऊन सरकारला यापुढे साथ देणार नाही हे सांगा, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देजनआक्रोश-हल्लाबोल मोर्चाला प्रचंड प्रतिसादगुलाम नबींनी डागली मोदींवर तोफ

आॅनलाईन लोकमतनागपूर : बळीराजा संकटात असताना सरकारने कर्जमाफीची रक्कम दिली नाही. शेतमलाला किंमत दिली नाही. कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे आता सरकारचे कुठलेही देणे भरणार नाही, विजेचे बिलही भरणार नाही, असा निर्णय घ्या. या मोर्चातून गेल्यावर घरोघरी जाऊन सरकारला यापुढे साथ देणार नाही हे सांगा, असे आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. एवढेच नव्हे तर दमदाटी करून, तुरुंगात टाकून सामान्य माणसाचा आवाज दाबाल तर तुम्हाला उखडून फेकण्याची ताकद बळीराजात आहे, असा गर्भित इशाराही त्यांनी सरकारला दिला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात जनमानसात असलेली खदखद मांडण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ‘जनआक्रोश- हल्लाबोल’ मोर्चा काढला. मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षांच्या मोर्चाचे रूपांतर झिरो माईल टी-पॉर्इंट येथे जाहीर सभेत झाले. यावेळी मंचावर काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, अ.भा.काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, काँग्रेस नेते माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पतंगराव कदम आदी उपस्थित होते.मोर्चाला जमलेली हजारोंची गर्दी पाहून शरद पवार म्हणाले, झोपलेल्या सरकारवर हल्लाबोल करून जागे करायचे आहे आणि संधी मिळेल तेव्हा सरकार उलथून फेकायचे आहे. परिवर्तन होईपर्यंत हल्लाबोल थांबवायचा नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाही.पवारांनी काढली शरम देशाच्या नेतृत्वाकडून देशाला वेगळ्या दिशेने नेण्याची पावले टाकली जात आहेत. मणिशंकर अय्यर यांच्याघरी झालेल्या बैठकीत पाकच्या मदतीने गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करण्यावर चर्चा झाली, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. मनमोहनसिंग यांच्यासारख्या चारित्र्यसंपन्न व देशप्रेमीवर शंका घेतली. अशी भूमिका कुणी मांडली तर शरम वाटली पाहिजे. हे देशाच्या हिताचे नाही, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्र कोणत्याही परकीय ताकदीला पाऊल टाकू देत नाही. ही परंपरा पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केली, ही दु:खाची बाब आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी व संबंधितांचा संताप टाळण्यासाठी पाकिस्तानचा उल्लेख करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७