शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

छोडेंगे न तेरा साथ ओ साथी मरते दम तक

By admin | Updated: October 10, 2015 02:59 IST

ज्येष्ठ संगीतकार आणि आपल्या जादुई संगीताने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे रवींद्र जैन यांचे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात...

ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांचे निधन : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना नागपूर : ज्येष्ठ संगीतकार आणि आपल्या जादुई संगीताने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे रवींद्र जैन यांचे शुक्रवारी लीलावती रुग्णालयात दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. मूत्रपिंडाचा आजार बळावल्याने उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरातील एका कार्यक्रमासाठी ते ३ आॅक्टोबरला आले होते. पण प्रकृतीचा त्रास झाल्याने त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यांच्या अचानक निधनाने संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. ‘छोडेंगे न हम तेरा साथ..ओ साथी मरते दम तक....’ म्हणणाऱ्या रवींद्र जैन यांनी अखेरपर्यंत रसिकांच्या सेवेत स्वत:ला झोकून देत त्यांचे म्हणणे खरे केले. रवींद्र जैन यांच्या चाहत्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम टाळून त्यांना ‘प्लॅटिना’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरातील कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक गीताची चाल कशी बांधली आणि त्याचे संगीत कसे सुचले, या आठवणी सांगणार होते. त्यांना ऐकण्यासाठी चाहत्यांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. पण कार्यक्रमापूर्वीच त्यांना मूत्रपिंडाचा त्रास झाला. याप्रसंगी त्यांच्या बंधूंनी कार्यक्रमात येऊन चाहत्यांची माफी मागितली होती. तीन वर्षापूर्वी अपंग वित्त विकास महामंडळाच्यावतीने अपंग साहित्य संमेलनाचे आयोजन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल दोन दिवस रवींद्र जैन नागपुरात थांबले होते. कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना गीत सादर करण्याची विनंती केली. चाहत्यांचा प्रतिसाद पाहून त्यांनी छोटेखानी कार्यक्रमही सादर केला होता. या कार्यक्रमाला नागपूरकरांची पसंती लाभली. त्यानंतर रवींद्र जैन यांनी निवांतपणे सर्व चाहत्यांशी संवादही साधला. त्यामुळे रवींद्र जैन यांच्याशी नागपूरकर खास जुळले होते. तीन वर्षानंतर त्यांच्या गीतांचा आणि संगीताचा प्रवास समजून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्यांची सर्व गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली पण रवींद्र जैन प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. यामुळे नागपूरकर रसिक हिरमुसले. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करीत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याने नागपूरकरांनी अश्रूंना वाट मोकळी केली. (प्रतिनिधी)