शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

दहावीनंतर मुलांच्या कामात लुडबूड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:27 IST

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञ जोशी यांचे मत : आत्महत्या करणे एक मोठे गूढ रहस्य

लोकमत न्यूज नेटवर्क नागूपर : आत्महत्या करणे हे एक मोठे गूढ रहस्य आहे. ८५ टक्के आत्महत्या कुठल्या न कुठल्या मानसिक आजारातून होतात, तर १५ टक्के आत्महत्या या नाचक्की, आर्थिक, शैक्षणिक, भीती, लाज आदी कारणाने होतात. मात्र आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.ऋत्विक बोके या बारावीचा विद्यार्थ्याची आत्महत्या ही त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातील कुटुंबीयांना धक्का देऊन गेली. या घटनेला घेऊन डॉ. अविनाश जोशी ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, आत्महत्येचा विचार येणे म्हणजे, इतरांचा रागावर स्वत:वर काढून स्वत:ला संपवून त्या व्यक्तीला धडा शिकविणे असल्यासारखे असते. ऋत्विक बोकेच्या प्रकरणात सध्याच काही बोलता येणार नाही. परंतु त्याची आत्महत्या ही १५ टक्क्यांमधील कारणामधील एक असावी. काही विद्यार्थी आपल्या मनातील समस्या दुसऱ्यांना सांगत नाही किंवा सांगू शकत नाही. अशा कुढत वावरणाºया विद्यार्थ्यांशी शिक्षक, पालकांनी लगेच हेरून त्याच्याशी संवाद वाढविणे फार महत्त्वाचे ठरते.

  • पालकांनो याकडे लक्ष द्या
  •  आपल्या इच्छा मुलांवर लादू नका
  •  दहावीनंतर त्यांच्या दैनंदिन कामात लुडबूड करू नका, मात्र ‘वॉच’ ठेवा.
  •  मुलाशी सकारात्मक संवाद साधा
  •  त्याच्या करिअरविषयी आस्थेने चौकशी करा
  •  त्याच्या इच्छांना मान द्या
  •  मुलांना अति‘पॉकेटमनी’ देणे टाळा.
  •  मुलाचा विश्वास संपादन करा
  •  दहावीनंतर त्याच्याशी मैत्रीपूर्व व्यवहार ठेवा.
  •  लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणायला शिका
टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर