शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दहावीनंतर मुलांच्या कामात लुडबूड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:27 IST

आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देमानसोपचार तज्ज्ञ जोशी यांचे मत : आत्महत्या करणे एक मोठे गूढ रहस्य

लोकमत न्यूज नेटवर्क नागूपर : आत्महत्या करणे हे एक मोठे गूढ रहस्य आहे. ८५ टक्के आत्महत्या कुठल्या न कुठल्या मानसिक आजारातून होतात, तर १५ टक्के आत्महत्या या नाचक्की, आर्थिक, शैक्षणिक, भीती, लाज आदी कारणाने होतात. मात्र आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी किंवा प्रयत्न केलेल्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास याचा मोठा फायदा होतो. ते या विचारापासून परावृत्त होतात, असे मत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दहावीनंतर मुलगा सज्ञान होतो. यामुळे त्याच्या दैनंदिन व्यवहारात पालकांनी लुडबूड करू नये, मात्र त्याच्यावर ‘वॉच’ ठेवावा, असेही ते म्हणाले.ऋत्विक बोके या बारावीचा विद्यार्थ्याची आत्महत्या ही त्याच्या कुटुंबीयांनाच नाही तर शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घरातील कुटुंबीयांना धक्का देऊन गेली. या घटनेला घेऊन डॉ. अविनाश जोशी ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, आत्महत्येचा विचार येणे म्हणजे, इतरांचा रागावर स्वत:वर काढून स्वत:ला संपवून त्या व्यक्तीला धडा शिकविणे असल्यासारखे असते. ऋत्विक बोकेच्या प्रकरणात सध्याच काही बोलता येणार नाही. परंतु त्याची आत्महत्या ही १५ टक्क्यांमधील कारणामधील एक असावी. काही विद्यार्थी आपल्या मनातील समस्या दुसऱ्यांना सांगत नाही किंवा सांगू शकत नाही. अशा कुढत वावरणाºया विद्यार्थ्यांशी शिक्षक, पालकांनी लगेच हेरून त्याच्याशी संवाद वाढविणे फार महत्त्वाचे ठरते.

  • पालकांनो याकडे लक्ष द्या
  •  आपल्या इच्छा मुलांवर लादू नका
  •  दहावीनंतर त्यांच्या दैनंदिन कामात लुडबूड करू नका, मात्र ‘वॉच’ ठेवा.
  •  मुलाशी सकारात्मक संवाद साधा
  •  त्याच्या करिअरविषयी आस्थेने चौकशी करा
  •  त्याच्या इच्छांना मान द्या
  •  मुलांना अति‘पॉकेटमनी’ देणे टाळा.
  •  मुलाचा विश्वास संपादन करा
  •  दहावीनंतर त्याच्याशी मैत्रीपूर्व व्यवहार ठेवा.
  •  लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणायला शिका
टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर