वीजपुरवठा खंडित करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:12+5:302021-03-04T04:12:12+5:30
वाडी : थकीत वीज बिलापाेटी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नका. ही माेहीम तातडीने बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण ...

वीजपुरवठा खंडित करू नका
वाडी : थकीत वीज बिलापाेटी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नका. ही माेहीम तातडीने बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीचे लाव्हा (वाडी) कार्यालयातील शाखा अभियंता रूपेश मेश्राम यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या टाळेबंदी काळात अनेकांचे राेजगार केले आहेत. ही मंडळी नुकतीच राेजगाराला लागली असून, त्यांच्यासह इतरांना आर्थिक संकटांना आजही सामाेरे जावे लागत आहे. त्यातच राज्य शासनाने विजेच्या दरात अप्रत्यक्ष वाढ केली असून, सामान्य वीज ग्राहक वाढीव वीजदाराचा भुर्दंड सहन करू शकत नाही. राेजगार गेल्याने व आर्थिक संकटांमुळे अनेकांकडे विजेची बिले थकीत राहिली आहे. त्या बिलांचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली आहे. ही माेहीम थांबविण्यात यावी तसेच कुणाचाही वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकरे, मनविसेचे तालुका अध्यक्ष अश्विन कोडापे, मनसेचे वाडी शहर अध्यक्ष अनिल पारखी, बालू मोहिते, अमर खंडाळ, धनराज ठाकरे, विनोद आवारी, राज सोनवणे, अमोल सोनसरे, अमोल जांभूळकर, संदीप माने, नितीन पिटोरे, अजिंक्य वाघमारे, मंगेश मेंघळ, रूपेश शिंदे, देवाजी पटले यांचा समावेश हाेता.