शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

विश्व वंदनीय शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 8:53 PM

शिवाजी महाराजांना आज काही लोक हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातर्फे शिवाजी जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘शिवमुद्रे’त नमूद असल्याप्रमाणे जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना ‘जगाला वंदनीय ठरेल असे स्वराज्य निर्माण करा’ असे आवाहन केले होते. महाराजांनीही तोच आदर्श ठेवत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्मीयांना समान स्थान होते. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च होता. सर्वांना समान आर्थिक वाटा मिळेल असे त्यांचे धोरण होते. त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने जगाला आदर्श ठरावे असे होते. मात्र आज काही लोक त्यांना हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाजी महाराज आणि वर्तमान स्थिती’ विषयावर आयोजित व्याख्यानात वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. खेडेकर यांनी शिवरायांच्या त्यावेळच्या कर्तृत्वाचे दाखले देत आज ते असते तर त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली असती, हा आशावाद मांडला. वर्तमान परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ‘क्षमता असेल तो टिकेल’ हा डार्विनचा सिद्धांत आज लागू पडतो. सूत्र आणि शास्त्र हे यशाचे तंत्र झाले आहे. भारतीयांची परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे. धार्मिक वादविवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. शिवाजी महाराज असते तर या समस्या नसत्या.आज शिक्षणाच्या नावाने पदवी घेऊन चालत नाही तर ‘अप्लाईड नॉलेज’ व संशोधनाच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. महाराज असते तर त्यांनी शिक्षणाची अशी व्यवस्था निर्माण केली असती. त्यांच्या राज्यात व्यसनावर बंदी असती. माध्यमांमध्ये सतत येणाऱ्या बलत्काराच्या बातम्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करून महिलांना पुन्हा घराच्या भिंतीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च मानणाऱ्या शिवरायांच्या राज्यात स्त्रिया कोणत्याही वेळी बिनदिक्कतपणे वावरू शकल्या असत्या. त्यांनी आपल्या मावळ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे ते असते तर अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा असती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८