शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिवाळी भेट : शेतकऱ्यांना उच्चदाबाने वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:37 IST

राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांनी केले चार उपकेंद्रांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.महावितरणतर्फे कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा तसेच काँग्रेसनगर विभागातील खामला आणि बुटीबोरी विभागातील जामठा येथील ३३/११ केव्हीए उपकेंद्राचे लोकार्पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, खा. कृपाल तुमाने, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, नारायण आमझरे उपस्थित होते.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील चार उपकेंद्रांचे लोकार्पण करून जिल्ह्याला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण केले आहे. तरोडी आणि वदोडा उपकेंद्राची उभारणी विहित मुदतीदरम्यान केल्याबद्दल महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.काँग्रेसनगर विभागासाठी १०० कोटीमहावितरणच्या काँग्रेसनगर विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाचा विभाग बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी या विभागातील विकास कामासाठी १०० कोटींचा विशेष निधी मंजूर केला असून त्यात रस्त्यावरील वीज खांब हटविणे, वाहिन्या भूमिगत करणे, घरावरील वीज वाहिन्या काढणे आदी कामांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बुटीबोरी जामठा येथील नॅशनल कॅन्सर संस्थेच्या परिसरात आणि नागपूर शहरातील खामला उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी केल्या. नागपूर शहराच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक हजार कोटींची विविध विकास कामे सुरू असून त्यात महावितरणसाठी १०६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.या परिसराला मिळणार लाभतरोडी येथील वीज उपकेंद्रातून अडका, परसोडी, बिडगाव परिसरातील २६०० ग्राहकांना वीजपुरवठा होणार आहे. तर वडोदा येथील वीज उपकेंद्रातून वडोदा, गुमथळा, पारडी परिसरातील २६०० वीज ग्राहकांना सहा वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होईल. यातून एकूण आठ वाहिन्या काढण्यात आल्या असून त्यावरून १७०० घरगुती, ९०० कृषी आणि १४ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळेल. तसेच खामला उपकेंद्रातून आठ वाहिन्यांद्वारे टेलिकॉमनगर, दीनदयालनगर, शास्त्री ले आऊट, सोमलवार निकालस शाळा, भेंडे ले-आऊट, खामला, पांडे ले-आऊट, चिंचभवन येथील १६,५०० वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होईल.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज