शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

दिवाळी भेट : शेतकऱ्यांना उच्चदाबाने वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:37 IST

राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांनी केले चार उपकेंद्रांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.महावितरणतर्फे कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा तसेच काँग्रेसनगर विभागातील खामला आणि बुटीबोरी विभागातील जामठा येथील ३३/११ केव्हीए उपकेंद्राचे लोकार्पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, खा. कृपाल तुमाने, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, नारायण आमझरे उपस्थित होते.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील चार उपकेंद्रांचे लोकार्पण करून जिल्ह्याला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण केले आहे. तरोडी आणि वदोडा उपकेंद्राची उभारणी विहित मुदतीदरम्यान केल्याबद्दल महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.काँग्रेसनगर विभागासाठी १०० कोटीमहावितरणच्या काँग्रेसनगर विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाचा विभाग बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी या विभागातील विकास कामासाठी १०० कोटींचा विशेष निधी मंजूर केला असून त्यात रस्त्यावरील वीज खांब हटविणे, वाहिन्या भूमिगत करणे, घरावरील वीज वाहिन्या काढणे आदी कामांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बुटीबोरी जामठा येथील नॅशनल कॅन्सर संस्थेच्या परिसरात आणि नागपूर शहरातील खामला उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी केल्या. नागपूर शहराच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक हजार कोटींची विविध विकास कामे सुरू असून त्यात महावितरणसाठी १०६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.या परिसराला मिळणार लाभतरोडी येथील वीज उपकेंद्रातून अडका, परसोडी, बिडगाव परिसरातील २६०० ग्राहकांना वीजपुरवठा होणार आहे. तर वडोदा येथील वीज उपकेंद्रातून वडोदा, गुमथळा, पारडी परिसरातील २६०० वीज ग्राहकांना सहा वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होईल. यातून एकूण आठ वाहिन्या काढण्यात आल्या असून त्यावरून १७०० घरगुती, ९०० कृषी आणि १४ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळेल. तसेच खामला उपकेंद्रातून आठ वाहिन्यांद्वारे टेलिकॉमनगर, दीनदयालनगर, शास्त्री ले आऊट, सोमलवार निकालस शाळा, भेंडे ले-आऊट, खामला, पांडे ले-आऊट, चिंचभवन येथील १६,५०० वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होईल.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज