शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या सुविधांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:41 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील १५ सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

ठळक मुद्दे१५ सरकारी इमारतींमध्ये द्याव्या लागतील सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील १५ सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी मंगळवारी यासंदर्भात निर्देश जारी करून संबंधित जनहित याचिका निकाली काढली.सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प, हॅन्डरेल, ट्रॅक टाईल्स पाथ, व्हील चेअर्स, स्वतंत्र पार्किंग, स्वच्छतागृहे, लिफ्ट इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, जलप्रदाय कार्यालय (पटवर्धन शाळेजवळ), विभागीय निबंधक कार्यालय (भांडे प्लॉट ), डाक कार्यालय (शंकरनगर), केंद्रीय अ‍ॅगमार्क कार्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कार्यालय, उप-निबंधक कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, महावितरण कंपनी कार्यालय, विधी महाविद्यालय, तंत्र शिक्षण विद्यालय, मुख्य वन संरक्षण कार्यालय, प्रत्यक्ष कर अकादमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व कर निर्धारण कार्यालय (हिवरीनगर) या इमारतींमध्ये संबंधित सुविधांचा अभाव आहे. या इमारतींमध्ये दिव्यांगांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे.संबंधित जनहित याचिका इंद्रधनू या सामाजिक संस्थेने दाखल केली होती. या मुद्यावर दाखल केलेली ही दुसरी जनहित याचिका होती.सार्वजनिक इमारतींमध्ये दिव्यांगांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या, पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही राज्य सरकार व महानगरपालिकेने न्यायालयाला दिल्यानंतर संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढण्यात आली होती.परंतु, परिस्थितीत समाधानकारक बदल घडला नाही. त्यामुळे संस्थेने दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली होती. संस्थेतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Divyangदिव्यांग