शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

दिव्यांगांच्या सुविधांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:41 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील १५ सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

ठळक मुद्दे१५ सरकारी इमारतींमध्ये द्याव्या लागतील सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहरातील १५ सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी मंगळवारी यासंदर्भात निर्देश जारी करून संबंधित जनहित याचिका निकाली काढली.सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प, हॅन्डरेल, ट्रॅक टाईल्स पाथ, व्हील चेअर्स, स्वतंत्र पार्किंग, स्वच्छतागृहे, लिफ्ट इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु, शहरातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, जलप्रदाय कार्यालय (पटवर्धन शाळेजवळ), विभागीय निबंधक कार्यालय (भांडे प्लॉट ), डाक कार्यालय (शंकरनगर), केंद्रीय अ‍ॅगमार्क कार्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कार्यालय, उप-निबंधक कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, महावितरण कंपनी कार्यालय, विधी महाविद्यालय, तंत्र शिक्षण विद्यालय, मुख्य वन संरक्षण कार्यालय, प्रत्यक्ष कर अकादमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व कर निर्धारण कार्यालय (हिवरीनगर) या इमारतींमध्ये संबंधित सुविधांचा अभाव आहे. या इमारतींमध्ये दिव्यांगांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे.संबंधित जनहित याचिका इंद्रधनू या सामाजिक संस्थेने दाखल केली होती. या मुद्यावर दाखल केलेली ही दुसरी जनहित याचिका होती.सार्वजनिक इमारतींमध्ये दिव्यांगांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या, पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही राज्य सरकार व महानगरपालिकेने न्यायालयाला दिल्यानंतर संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढण्यात आली होती.परंतु, परिस्थितीत समाधानकारक बदल घडला नाही. त्यामुळे संस्थेने दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली होती. संस्थेतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Divyangदिव्यांग