शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

जिल्हा बँकेला मिळाले, आम्ही कोणते ‘पाप’ केले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST

शरद मिरे भिवापूर : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीने भिवापूर तालुक्याला धुवून काढले. नुकसानीचे पंचनामे झाले. भरपाईपोटी लागणाऱ्या ...

शरद मिरे

भिवापूर : जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीने भिवापूर तालुक्याला धुवून काढले. नुकसानीचे पंचनामे झाले. भरपाईपोटी लागणाऱ्या एकूण रकमेची शासनाकडे मागणी केली. मात्र, दोन वर्षांनंतर केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला. राष्ट्रीयीकृत बँकेचे शेतकरी मात्र अद्यापही वंचितच आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेला मिळाले आणि आम्ही कोणते पाप केले, असा संतापजनक सवाल शेतकरी विचारत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त ठरलेल्या १,६९९ शेतकऱ्यांचे ६ कोटी ४५ लाख ५ हजार रुपये शासनाकडे अद्यापही प्रलंबित आहेत. तालुक्यात दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे २,१९७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. प्राप्त अहवालाच्या आधारे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली. मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांना थेट न देता, त्यांच्या कर्ज खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे. त्या बँकेच्या पीक कर्ज दरानुसार (स्केल ऑफ फायनान्स) १ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत घेतलेल्या कर्जाची मुद्दल व त्यावरील ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची व्याजाची रक्कम अशा एकूण रकमेची कर्जमाफी देण्याबाबत निर्णय घेतला. शासनाने अतिवृष्टीची रक्कम सदर बँकेच्या कर्ज खात्यात टाकल्यानंतर कर्जाच्या शिल्लक रकमेचा भरणा शेतकऱ्यांना करायचा होता. आता या अतिवृष्टीला दोन वर्षांचा कालखंड उलटला आहे. मात्र, २,१९७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४९८ सभासद शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला असून १ कोटी ७२ लाख रुपये त्यांच्या पीक कर्जाच्या खात्यात टाकण्यात आले. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकेच्या १,६९९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्यांचे ६ कोटी ४५ लाख ५ हजार रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत.

अशी आहे शेतकऱ्यांची संख्या

तालुक्यातील काही शेतकरी उमरेड तालुक्यातील बँकेचे खातेदार आहेत. बँकनिहाय वंचित शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बँक ऑफ इंडिया, भिवापूर- ३१९ शेतकरी, विदर्भ कोकण बँक, उमरेड- ५८, विदर्भ कोकण बँक, बेला- १, कॅनरा बँक, उमरेड- १५, बँक ऑफ इंडिया, कारगाव- २५७, स्टेट बँक, भिवापूर- १५१, युनियन बँक, उमरेड- ६५, युको बँक, सिर्सी- १७६, आयडीबीआय बँक, बेसुर- १२६, बँक ऑफ महाराष्ट्र, उमरेड -१४५, बँक ऑफ महाराष्ट्र, नांद- ३८६ असे एकूण ११ बँकांच्या १,६९९ खातेदार शेतकऱ्यांचे ६ कोटी ४५ लाख ५ हजार रुपये प्रलंबित आहेत. केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत ४९८ शेतकऱ्यांना नुकसानीचे १ कोटी ७२ लाख रुपये पीककर्ज खात्यात देण्यात आले आहे.

-

जुलै, ऑगस्ट २०१९ मधील नुकसानीसंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रस्ताव सर्वप्रथम प्राप्त झाले. त्यांचे ऑडिट वेळेवर झाले. त्यामुळे शासनाकडून रक्कम वेळेत प्राप्त झाली. याउलट राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रस्ताव उशिरा आल्याने रक्कम प्रलंबित आहेत.

-नरेश खोब्रागडे, सहायक निबंधक सहकारी संस्था, उमरेड