शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दररोज शेकडो प्रवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वितरण

By नरेश डोंगरे | Updated: May 12, 2024 00:01 IST

सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांचाही सहभाग : गरमी अन् उकाड्यात रेल्वे प्रवाशांना दिलासा

नागपूर : सेवाभावी व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर दररोज सुमारे दोन हजारांवर रेल्वे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. उन्हाचा तडाखा आणि प्रचंड गर्दीमुळे शरीरातून घामाच्या धारा निघतात. उकाड्यामुळे शरीराला थोड्या थोड्या वेळेनंतर पाण्याची गरज भासते. मात्र, प्रत्येकच प्रवाशी खास करून ज्येष्ठ नागरिक, गाडीच्या खाली उतरून स्टॉलवर किंवा नळावर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. अनेक जण पाण्याची बाटली विकत घेऊ शकत नाही. ते ध्यानात घेऊन त्यांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मांडली होती. त्यानुसार, ठिकठिकाणच्या सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांना आवाहन करण्यात आले. त्याला अनेकांनी दाद दिली. त्यातून १४ एप्रिल २०२४ पासून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, सेवाग्राम आणि आमला यासह अनेक रेल्वे स्थानकांवर हा उपक्रम राबविला जात आहे. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते, अशा गाड्यांच्या सामान्य आणि स्लीपर कोचजवळ जाऊन रेल्वे प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. साधारणत: दरदिवशी एका स्थानकावर दोन हजारांवर प्रवाशांना ही सुविधा दिली जात आहे. गर्दी आणि उकाड्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांना या स्तुत्य उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे. अधिकारीही देत आहेत सेवाया योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, सेवा भाव जपणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकारीही स्वत: रेल्वे प्रवाशांना मोफत पाणी देण्याच्या उपक्रमात सहभागी होत आहेत. काही ठिकाणच्या संघटना बिस्किट पॅकेट आणि फळांचेही वाटप करीत असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर