शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दररोज शेकडो प्रवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वितरण

By नरेश डोंगरे | Updated: May 12, 2024 00:01 IST

सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांचाही सहभाग : गरमी अन् उकाड्यात रेल्वे प्रवाशांना दिलासा

नागपूर : सेवाभावी व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर दररोज सुमारे दोन हजारांवर रेल्वे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. उन्हाचा तडाखा आणि प्रचंड गर्दीमुळे शरीरातून घामाच्या धारा निघतात. उकाड्यामुळे शरीराला थोड्या थोड्या वेळेनंतर पाण्याची गरज भासते. मात्र, प्रत्येकच प्रवाशी खास करून ज्येष्ठ नागरिक, गाडीच्या खाली उतरून स्टॉलवर किंवा नळावर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. अनेक जण पाण्याची बाटली विकत घेऊ शकत नाही. ते ध्यानात घेऊन त्यांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मांडली होती. त्यानुसार, ठिकठिकाणच्या सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांना आवाहन करण्यात आले. त्याला अनेकांनी दाद दिली. त्यातून १४ एप्रिल २०२४ पासून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, सेवाग्राम आणि आमला यासह अनेक रेल्वे स्थानकांवर हा उपक्रम राबविला जात आहे. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते, अशा गाड्यांच्या सामान्य आणि स्लीपर कोचजवळ जाऊन रेल्वे प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. साधारणत: दरदिवशी एका स्थानकावर दोन हजारांवर प्रवाशांना ही सुविधा दिली जात आहे. गर्दी आणि उकाड्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांना या स्तुत्य उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे. अधिकारीही देत आहेत सेवाया योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, सेवा भाव जपणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकारीही स्वत: रेल्वे प्रवाशांना मोफत पाणी देण्याच्या उपक्रमात सहभागी होत आहेत. काही ठिकाणच्या संघटना बिस्किट पॅकेट आणि फळांचेही वाटप करीत असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर