शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

डीबीटी योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:20 IST

वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मेस व स्टायपंड म्हणून मिळणारे अनुदान थेट विद्यार्थ्यांना लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. डीबीटी विरोधात पुणे ते नाशिक पदयात्रा काढणाऱ्या ७५० विद्यार्थ्यांना सिन्नर येथे ताब्यात घेतल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे.

ठळक मुद्देराज्यव्यापी आंदोलनाचा इशारा : नाशिकच्या घटनेचा निषेध

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मेस व स्टायपंड म्हणून मिळणारे अनुदान थेट विद्यार्थ्यांना लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. डीबीटी विरोधात पुणे ते नाशिक पदयात्रा काढणाऱ्या ७५० विद्यार्थ्यांना सिन्नर येथे ताब्यात घेतल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे.आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ-नागपूरच्यावतीने मंगळवारी पत्रपरिषद आयोजित करून या विद्यार्थ्यांनी सिन्नर पोलीस व शासनाचा तीव्र निषेध केला. संघटनेचे अध्यक्ष मुकेश नरोटे यांनी सांगितले, राज्यात २८३ मुलांचे व २०८ मुलींचे वसतिगृह असून ५८४९५ इतक्या विद्यार्थ्यांची क्षमता आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शासनाच्या देखरेखीखाली वसतिगृहातच भोजनाची सुविधा व शैक्षणिक व दैनंदिन उपयोगाचे साहित्य पुरविले जात आहे. मात्र ६ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार बेडिंग, स्टेशनरी, पुस्तके व गणवेशासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर नुकतेच ५ एप्रिल २०१८ ला शासनाने नवीन जीआर काढून भोजनाचे अनुदानही थेट खात्यात देण्याची योजना सुरू केली. ही योजना पारदर्शक असल्याचा दावा शासन करीत असले तरी अनुदान मिळण्यास होणारा विलंब होत असून त्यामुळे शासनाच्या प्रामाणिकपणावर संशय येत असल्याचे त्यांनी सांगितले.नरोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. गेल्या सात आठ महिन्यापासून स्टायपंड मिळाले नाही आणि मेस तसेच शैक्षणिक साहित्याचे अनुदानही चार महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. अधिवेशन पाहून आता शासनाने तीन महिन्याचे अनुदान जमा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वेळेवर पैसा येत नसल्याने विद्याथ्यांच्या मेसच्या अडचणी येत आहेत. शैक्षणिक साहित्याचे अनुदान पुरेसे नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भोजन आणि इतर साहित्यासाठी बाहेर भटकावे लागत असल्याने अधिकचा मनस्ताप विद्यार्थ्यांना होत आहे. हा सर्व प्रकार करून शासनाने स्वत:ची जबाबदारी झटकल्याचा आरोप नरोटे यांनी केला. नाशिकमध्ये अटक झालेल्या विद्यार्थ्यांना त्वरित सोडून या मुद्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रपरिषदेला गणेश इरपाचे, स्नेहा मेश्राम, संतोष मडावी, शिवकुमार कोकोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन