शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

डीबीटी योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:20 IST

वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मेस व स्टायपंड म्हणून मिळणारे अनुदान थेट विद्यार्थ्यांना लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. डीबीटी विरोधात पुणे ते नाशिक पदयात्रा काढणाऱ्या ७५० विद्यार्थ्यांना सिन्नर येथे ताब्यात घेतल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे.

ठळक मुद्देराज्यव्यापी आंदोलनाचा इशारा : नाशिकच्या घटनेचा निषेध

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मेस व स्टायपंड म्हणून मिळणारे अनुदान थेट विद्यार्थ्यांना लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. ही योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. डीबीटी विरोधात पुणे ते नाशिक पदयात्रा काढणाऱ्या ७५० विद्यार्थ्यांना सिन्नर येथे ताब्यात घेतल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे.आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ-नागपूरच्यावतीने मंगळवारी पत्रपरिषद आयोजित करून या विद्यार्थ्यांनी सिन्नर पोलीस व शासनाचा तीव्र निषेध केला. संघटनेचे अध्यक्ष मुकेश नरोटे यांनी सांगितले, राज्यात २८३ मुलांचे व २०८ मुलींचे वसतिगृह असून ५८४९५ इतक्या विद्यार्थ्यांची क्षमता आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शासनाच्या देखरेखीखाली वसतिगृहातच भोजनाची सुविधा व शैक्षणिक व दैनंदिन उपयोगाचे साहित्य पुरविले जात आहे. मात्र ६ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार बेडिंग, स्टेशनरी, पुस्तके व गणवेशासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर नुकतेच ५ एप्रिल २०१८ ला शासनाने नवीन जीआर काढून भोजनाचे अनुदानही थेट खात्यात देण्याची योजना सुरू केली. ही योजना पारदर्शक असल्याचा दावा शासन करीत असले तरी अनुदान मिळण्यास होणारा विलंब होत असून त्यामुळे शासनाच्या प्रामाणिकपणावर संशय येत असल्याचे त्यांनी सांगितले.नरोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. गेल्या सात आठ महिन्यापासून स्टायपंड मिळाले नाही आणि मेस तसेच शैक्षणिक साहित्याचे अनुदानही चार महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. अधिवेशन पाहून आता शासनाने तीन महिन्याचे अनुदान जमा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वेळेवर पैसा येत नसल्याने विद्याथ्यांच्या मेसच्या अडचणी येत आहेत. शैक्षणिक साहित्याचे अनुदान पुरेसे नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. भोजन आणि इतर साहित्यासाठी बाहेर भटकावे लागत असल्याने अधिकचा मनस्ताप विद्यार्थ्यांना होत आहे. हा सर्व प्रकार करून शासनाने स्वत:ची जबाबदारी झटकल्याचा आरोप नरोटे यांनी केला. नाशिकमध्ये अटक झालेल्या विद्यार्थ्यांना त्वरित सोडून या मुद्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रपरिषदेला गणेश इरपाचे, स्नेहा मेश्राम, संतोष मडावी, शिवकुमार कोकोडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन