आपत्ती व्यवस्थापन कोलमडणार नाही?

By Admin | Updated: June 12, 2014 01:12 IST2014-06-12T01:12:52+5:302014-06-12T01:12:52+5:30

पूर्व विदर्भात पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आहे. सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त

Disaster Management Will Not Blame | आपत्ती व्यवस्थापन कोलमडणार नाही?

आपत्ती व्यवस्थापन कोलमडणार नाही?

नागपूर : पूर्व विदर्भात पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आहे. सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त एकच जनरेटर आहे. इतर जिल्ह्यात तो नाही. इतर आवश्यक उपकरणांच्या बाबतीतही अशीच अवस्था असल्याने ही यंत्रणा किती सक्षम आहे याचा प्रत्यय यावा. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद््भवली तर बचाव कार्यासाठी जनरेटरची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळापूर्व नियोजनाचा एक भाग म्हणून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज करण्याचा दावा केला जातो. त्याचे समन्वयन नियंत्रण विभागीय आयुक्त कार्यालयातून केले जाते. जिल्हा पातळीवर आढावा घेतल्यानंतर विभाग पातळीवर व नंतर राज्य पातळीवर आढावा घेतला जातो. अलीकडेच राज्यपातळीवर अशा प्रकारची बैठक झाली. त्या बैठकीत पूर्व विदर्भातील तयारीची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार आवश्यक उपकरणांचा प्रत्येक जिल्ह्याकडे तुटवडा असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी पूरपस्थिती उद््भवली तर मदतकार्यासाठी जनरेटरची गरज भासते. मात्र सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात जनरेटर आहे व तोही एकच आहे. पूर्व विदर्भात संभाव्य पुराचा धोका असणारी एकूण ६८६ गावे आहेत. ही संख्या लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे आकडेवारी सांगते. नागपूर जिल्ह्यात २३४, वर्धा जिल्ह्यात ८८, भंडारा जिल्ह्यात १४९, गोंदिया जिल्ह्यात ८७, चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४२ गावांना पुराचा धोका असताना या जिल्ह्यांकडे जनरेटर नाही. एकाच दिवशी अनेक गावात पूरपरिस्थिती उद््भवण्याच्या घटना यापूर्वी पूर्व विदर्भात घडल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे.
अंधारात मदत कार्यासाठी सर्च लाईटची गरज भासते. नागपूर जिल्ह्यात फक्त ४ सर्च लाईट आहेत. गडचिरोलीत तर एकही नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या ‘फर्स्ट एड्् किट’यंत्रणेकडे नाही. एकूणच परिस्थिती गंभीर आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disaster Management Will Not Blame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.