शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अग्निशमन विभागाची आपत्ती व्यवस्थापन समिती गठित; झोन कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू

By मंगेश व्यवहारे | Updated: June 13, 2024 13:12 IST

२४ तास सक्रीय राहिल २७ जवानांचे पथक

मंगेश व्यवहारे, नागपूर : सप्टेंबर २०२३ मध्ये पावसाचे भयावह चित्र नागपूरकरांनी अनुभवले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला. यंदा मान्सूनच्या काळात येणाऱ्या आपत्तीचा निपटारा करण्यासाठी अग्निशमन विभाग सक्रीय झाला आहे. अग्निशमन केंद्राबरोबर झोन कार्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू झाले आहे. २४ तास सक्रीय असणारे २७ जणांचे आपत्ती व्यवस्थापन पथक तयार आहे. त्याचबरोबर पोहणाऱ्या २५ लोकांची टीम ही गठित करण्यात आली आहे.

दरवर्षी १ जून ते ३० सप्टेंबर काळात आयुक्तांच्या निर्देशानुसार नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतो. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी झोननिहाय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अग्निशमन विभागाने नियोजन केले आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास, पूर आल्यास बचावासाठी अग्निशमन विभाग कार्यरत असतो. यंदा शहरा आपत्ती व्यवस्थापन टीमचे नेतृत्व उपअग्निशमन अधिकारी सतीश रहाटे करणार आहे. त्यांच्यासोबत उपअग्निशमन अधिकारी रवींद्र मरसकोल्हे, प्रकाश कावडकर, वरिष्ठ लिपिक अरुण भोपळे, अग्निशमन विमोचक राजेश वानखेडे यांच्यासह अन्य जवानांचा समावेश आहे.

या पथकाचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. जो शहरातील कुठल्याही भागात निर्माण झालेल्या आपत्तीला तत्काळ प्रतिसाद देईल. त्याचबरोबर संबंधित एरीयातील अग्निशमन केंद्रातील जवान देखील बचाव कार्यात सहभागी होईल. २३ सप्टेंबर २०२३ ला आलेल्या पूरातून अग्निशमन विभागाच्या जवानांनी ५०० ते ६०० लोकांना सुरक्षित बाहेर काढले होते.

  • आपत्तीचा सामना करायला विभाग सक्षम

मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे म्हणाले की शहर आपत्ती व्यवस्थापन पथकात पट्टीच्या पोहणाऱ्यांची टीमही तयार करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्राला अग्निशमन विभागाने दिशानिर्देश दिलेले आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार झोननिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकराच्या आपत्तीशी निपटायला विभाग तत्पर आहे.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलnagpurनागपूर