शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रेशनऐवजी येणार थेट रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:40 IST

Nagpur : छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि वर्धा जिल्ह्यात लागू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला. हा निर्णय छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील केवळ वर्धा जिल्ह्यासाठी लागू करण्यात आला आहे.

या योजनेचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर झाला. त्यानुसार, या योजनेतून लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून प्रति महिना १५० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होते. मात्र, नंतर २० जून २०२४ रोजी या योजनेत सुधारणा करण्यात आली.

या सुधारित निर्णयानुसार, आता एप्रिल २०२४ पासून प्रति महिना प्रति लाभार्थी १६० रुपये थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे. या रकमेने अन्नधान्याच्या जागी शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. शासनाने आधी ठरवले होते की प्रति लाभार्थी १५० रुपये देण्यात येतील; पण नंतर या रकमेतील वाढ करून ती १६० रुपये केली आहे. हा बदल शेतकऱ्यांसाठी आणखी फायदेशीर ठरला आहे. याशिवाय, राज्य सरकारने या योजनेत अन्नधान्य वितरणातील गुंतागुंतीला कमी करण्यासाठी व वितरण सोपे व्हावे यासाठी लेखाधिकारी, आरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांना नियुक्त करून योजनेची योग्य अंमलबजावणी करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनचा विरोध

  • ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. फेडरेशनचे कार्याध्यक्ष संजय पाटील यांचे म्हणणे आहे की, ही योजना गरीब कार्डधारक जनतेची शुद्ध फसवणूक आहे.
  • हक्काच्या रेशनपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. उद्या ही योजना सर्व लाभार्थ्यांसाठीही लागू केली जाईल. शासन गरीब लाभार्थ्यांना रेशनऐवजी रक्कम देऊन मोकळी होईल. यामुळे भूकबळी व उपासमारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शासनाने यावर फेरविचार करावा अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टॅग्स :nagpurनागपूर