शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

न्यायसहायक प्रयोगशाळांची दुरवस्था, हायकोर्टाने सरकारला मागितले उत्तर

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 10, 2024 13:21 IST

Nagpur : ४४७ पदे रिक्त आणि ६ लाख ४३ हजार २४२ नमुने प्रलंबित

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला यावर २ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यापूर्वी न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका आरोपीच्या जामीन प्रकरणात दिलेल्या आदेशानंतर न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालक संगीता घुमटकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून धक्कादायक माहिती दिली. या प्रतिज्ञापत्रानुसार, ३१ जुलै २०२४ पर्यंत राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये ४४७ पदे रिक्त होती. तसेच, १ लाख ८४ हजार ९२५ फौजदारी प्रकरणांमधील ६ लाख ४३ हजार २४२ नमुने प्रलंबित होते. त्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांतील डीएनए नमुन्यांची संख्या मोठी होती. अनेक नमुने २०१७ पासून प्रलंबित होते. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी न्या. सानप यांनी ही बाब लक्षात घेता न्यायसहायक प्रयोगशाळांच्या विकासाकरिता याचिका दाखल करून घेण्याचे निर्देश न्यायिक व्यवस्थापकांना दिले होते. या याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी वरिष्ठ ॲड. अनिल मार्डीकर यांनी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन पदांचा प्रस्ताव प्रलंबितराज्यातील न्यायसहायक प्रयोगशाळांना सध्या १ हजार ४६३ पदे मंजूर आहेत. प्रयोगशाळा संचालनालयाने प्रलंबित नमुने व काळाची गरज लक्षात घेता आणखी १ हजार ९८१ नवीन पदे निर्माण करण्यासाठी १३ एप्रिल २०२३ रोजी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला गेला आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. प्रयोगशाळांमध्ये केवळ कर्मचारीच नाही तर, साहित्य, उपकरणे व मशीनचीही कमतरता आहे. त्यामुळे नमुने तपासण्यास विलंब होतो. नमुने दीर्घ काळ प्रलंबित राहतात. फौजदारी न्याय व्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो. सरकारला आरोपीविरुद्ध गुन्हे सिद्ध करता येत नाहीत. त्यामुळे आरोपी संशयाच्या आधारावर निर्दोष सुटतात.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरGovernmentसरकार