शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चरला हायकोर्टात ५० लाख रुपये जमा करायचे निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 12, 2025 17:59 IST

Nagpur : शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्यामुळे बसला दणका

राकेश घानोडे नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील पॉवर स्टेशनच्या पाणी पाईप लाईनमुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान होत असल्यामुळे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये ५० लाख रुपये जमा करावे, असे निर्देश बुधवारी देण्यात आले. याकरिता कंपनीला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली.

या समस्येसंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने तहसीलदारांची दोन प्रतिज्ञापत्रे लक्षात घेता धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या पॉवर स्टेशनची पाणी पाईप लाईन शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीकरिता कारणीभूत ठरत असल्याचे ठोस पुरावे रेकॉर्डवर आहेत, असे स्पष्ट केले. त्यावर कंपनीने स्वत:ची बाजू मांडताना पाणी पाईप लाईनबाबतच्या अटींचे उल्लंघन केले नाही, असे सांगितले. तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कंपनी गांभिर्याने प्रयत्न करीत आहे, अशी माहितीही दिली. परंतु, यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. परिणामी, न्यायालयाने कंपनीला स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ५० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी प्रलंबितधारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने पाणी पाईप लाईनबाबतच्या अटींचे उल्लंघन केले किंवा नाही, याची जिल्हाधिकाऱ्यांद्वारे चौकशी केली जात आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, चौकशी सध्या कोणत्या टप्प्यात आहे आणि आतापर्यंतच्या चौकशीमध्ये काय आढळून आले, याची माहिती पुढच्या सुनावणीपूर्वी रेकॉर्डवर सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

नियमित देखभाल केली जात नाही

याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड. शिल्पा गिरटकर यांनी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जबाबदारीने वागत नाही, असा गंभीर आरोप केला. पाईप लाईनची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. परंतु, कंपनी याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

२० किलोमीटर लांब पाईप लाईनजल संसाधन विभागाने ६०० मेगावॅट क्षमतेच्या धारीवाल पॉवर स्टेशनला वर्धा नदीमधील पाणी वापरण्यास तर, जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाईप लाईन टाकण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, कंपनीने शेतांतील शिवधुऱ्यावरून सुमारे २० किलोमीटर लांब पाईप लाईन टाकली आहे. ही पाईप लाईन अनेकदा फुटते. त्यामुळे शेतपिकांचे नुकसान होते.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय