बुद्धांच्या तत्त्वांचा धम्मभूमीने केला जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:14+5:302021-05-27T04:09:14+5:30

- विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली बुद्धजयंती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे, ...

Dhammabhoomi awakened the principles of Buddha | बुद्धांच्या तत्त्वांचा धम्मभूमीने केला जागर

बुद्धांच्या तत्त्वांचा धम्मभूमीने केला जागर

- विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली बुद्धजयंती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे, या तिथीला बुद्ध पौर्णिमाही म्हटले जाते. मनात अशांतीचे ग्रहण लागले असेल आणि मनाला भयाने ग्रासले असेल, तेव्हा बुद्धाला शरण जाणे अर्थात बुद्ध तत्त्वे अंगीकारण्याचा अर्थात विरक्त होण्याचा संदेश तथागत गौतम बुद्धाने जगताला दिला. त्या तत्त्वांचा जागर शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने करण्यात आला. त्यानिमित्ताने बुद्धविहारांमध्ये बुद्धवंदना, धम्मदेसना करण्यात आली. काही ठिकाणी विपश्यना तर कुठे ऑनलाइन व्याख्याने पार पडली. यासोबतच काही संघटनांकडून सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. भोजनदान, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचे मोफत वितरण करण्याचे उपक्रमही नागपुरात पार पडले. एकूणच उदारता व्यक्त करत नागपूरकरांनी बुद्ध जयंती साजरी केली.

..........

Web Title: Dhammabhoomi awakened the principles of Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.