शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डीजींची व्हीसी आणि गृहखात्याचा आदेश; आधी गणेशोत्सव बंदोबस्त, नंतर बदलीचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 21:40 IST

बदलीसाठी पात्र असलेल्या राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता गणेशोत्सवाचा बंदोबस्त आटोपल्यानंतरच केल्या जाणार आहेत.

नरेश डोंगरेनागपूर : पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी राज्यातील शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन चर्चा ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) केल्यानंतर आज शुक्रवारी गृह विभागाकडून पोलीस बदलीच्या संबंधाने एक आदेश काढण्यात आला. त्यानुसार बदलीसाठी पात्र असलेल्या राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता गणेशोत्सवाचा बंदोबस्त आटोपल्यानंतरच केल्या जाणार आहेत.बदलीसाठी पात्र आणि उत्सुक असलेल्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्कंठता ताणून धरणारा हा विषय गेल्या पंधरा दिवसांपासून मंत्रालयात आणि राज्य पोलीस दलात चर्चेला आला आहे. अनेक अधिकारी पाहिजे त्या ठिकाणी आपली नियुक्ती करून घेण्यास उत्सुक आहे. तर अनेक अधिकारी आहे त्याच ठिकाणी राहता यावे म्हणूनही फिल्डिंग लावून आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तेतील तीनही पक्षाच्या नेत्यांकडून एकाच जागेसाठी वेगवेगळे नाव देण्यात आलेले आहे. दुसरीकडे पोलीस महासंचालनालयातूही कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नियुक्त करायचे, यासंबंधीची यादी तयार झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर एकमत होऊ शकले नाही.परिणामी बदलीसाठी तयारी करून बसलेले अनेक अधिकारी दिवस मोजल्या सारखे करीत होते. मतभिन्नतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी राज्यातील शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन आगामी गणेशोत्सव, १५ ऑगस्ट बंदोबस्ताबाबत चर्चा केली. व्हीसीत बदलीचाही विषय प्रमुख्याने चर्चेला होता. तूर्त कोणतेही बदल्या होणार नाही असे संकेत त्यांनी या व्हीसीमध्ये दिले होते. त्याची चर्चा असतानाच शुक्रवारी गृह विभागाकडून उपसचिव कैलास गायकवाड यांनी एक सूचनापत्र मुंबई पोलीस आयुक्त वगळता राज्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठविले. त्या पत्रात कोविड-१९ चा हवाला देत राज्य पोलीस सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी दिलेली मुदत शासन निर्णयाद्वारे ५ सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.---सर्व लागले आपापल्या कामीगृह विभागाने काढलेल्या आजच्या या आदेश वजा सूचना पत्रानुसार आतापर्यंत बदलीसाठी आस लावून असलेले पोलीस अधिकारी आपआपल्या कामी लागले आहेत. विशेष म्हणजे लोकमत'ने १० ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे वृत्त प्रकाशित करून अनिश्चितता उघड केली होती.