शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डीजींची व्हीसी आणि गृहखात्याचा आदेश; आधी गणेशोत्सव बंदोबस्त, नंतर बदलीचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 21:40 IST

बदलीसाठी पात्र असलेल्या राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता गणेशोत्सवाचा बंदोबस्त आटोपल्यानंतरच केल्या जाणार आहेत.

नरेश डोंगरेनागपूर : पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी राज्यातील शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन चर्चा ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) केल्यानंतर आज शुक्रवारी गृह विभागाकडून पोलीस बदलीच्या संबंधाने एक आदेश काढण्यात आला. त्यानुसार बदलीसाठी पात्र असलेल्या राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता गणेशोत्सवाचा बंदोबस्त आटोपल्यानंतरच केल्या जाणार आहेत.बदलीसाठी पात्र आणि उत्सुक असलेल्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्कंठता ताणून धरणारा हा विषय गेल्या पंधरा दिवसांपासून मंत्रालयात आणि राज्य पोलीस दलात चर्चेला आला आहे. अनेक अधिकारी पाहिजे त्या ठिकाणी आपली नियुक्ती करून घेण्यास उत्सुक आहे. तर अनेक अधिकारी आहे त्याच ठिकाणी राहता यावे म्हणूनही फिल्डिंग लावून आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तेतील तीनही पक्षाच्या नेत्यांकडून एकाच जागेसाठी वेगवेगळे नाव देण्यात आलेले आहे. दुसरीकडे पोलीस महासंचालनालयातूही कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नियुक्त करायचे, यासंबंधीची यादी तयार झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर एकमत होऊ शकले नाही.परिणामी बदलीसाठी तयारी करून बसलेले अनेक अधिकारी दिवस मोजल्या सारखे करीत होते. मतभिन्नतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी राज्यातील शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन आगामी गणेशोत्सव, १५ ऑगस्ट बंदोबस्ताबाबत चर्चा केली. व्हीसीत बदलीचाही विषय प्रमुख्याने चर्चेला होता. तूर्त कोणतेही बदल्या होणार नाही असे संकेत त्यांनी या व्हीसीमध्ये दिले होते. त्याची चर्चा असतानाच शुक्रवारी गृह विभागाकडून उपसचिव कैलास गायकवाड यांनी एक सूचनापत्र मुंबई पोलीस आयुक्त वगळता राज्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठविले. त्या पत्रात कोविड-१९ चा हवाला देत राज्य पोलीस सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी दिलेली मुदत शासन निर्णयाद्वारे ५ सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.---सर्व लागले आपापल्या कामीगृह विभागाने काढलेल्या आजच्या या आदेश वजा सूचना पत्रानुसार आतापर्यंत बदलीसाठी आस लावून असलेले पोलीस अधिकारी आपआपल्या कामी लागले आहेत. विशेष म्हणजे लोकमत'ने १० ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे वृत्त प्रकाशित करून अनिश्चितता उघड केली होती.