शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 12:27 IST

अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले.

नागपूर : देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भाजप मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जो काही अभ्यासक्रम आहे हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यात वेळोवेळी तज्ज्ञांनी वेळोवेळी बदल केले आहेत. केवळ अल्पसंख्यांकाची मत मिळवण्याकरता, त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम, काही नेते करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. नुकतंच, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार, जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणाले होते. यावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी यावेळी शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले.

जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय

नागपूरमधील विधीज्ञ सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, जमीनीच्या प्रकरणांमध्ये नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मूळ तक्रार ही नागपूर पोलिसांची असून त्याच्याआधारे ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावर २००५ पासून विविध एफआयआर दाखल आहेत. त्यांना न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणीही शिक्षा झालेली आहे. त्यामुळे, जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणEducationशिक्षणStudentविद्यार्थीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा