शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

गावाचा विकास हाच खरा देशाचा विकास

By admin | Updated: December 2, 2014 00:33 IST

गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून गांधीजींच्या विचारांनीच या देशाचा खरा विकास होऊ शकेल.

जाहीर व्याख्यान : अण्णा हजारे यांचा विश्वास नागपूर : गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून गांधीजींच्या विचारांनीच या देशाचा खरा विकास होऊ शकेल. प्रकृतीचे दोहण न करता होणारा विकास शाश्वत विकास होय, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे व्यक्त केला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास नागपूर विभागातर्फे सोमवारी सायंकाळी रामगोपाल माहेश्वरी सभागृह सीताबर्डी येथे आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे होते. याप्रसंगी अण्णा हजारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अण्णा हजारे पुढे म्हणाले, प्रकृतीचे दोहण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण वाढले आहे. यातून वेगवेगळे आजार वाढत आहे. तापमान ५० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे समुद्राच्या काठांवर असलेली शहरे धोक्यात आली आहेत. त्यामुळेच महात्मा गांधीजींनी प्रकृतीचे रक्षण करा, गावाकडे चला असा संदेश दिला होता. त्यांच्या विचारांनी आम्ही कामाला सुरुवात केली. ज्या गावात बाराही महिने दुष्काळ राहत होता, तिथे प्रकृती रक्षणाचे काम हाती घेतले. पावसाचे पाणी अडविले, ते जमिनीत साचवले. त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढली. एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेले गाव आज वर्षभर पीक घेणारे बनले आहे. उमेश चौबे यांनी राजकारणावर प्रहार करीत भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असलेल्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचे सांगितले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास राळेगण सिद्धीचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा बेले यांनी गुरुवंदना सादर केली. सुमितकुमार ‘आतिष’ यांनी अण्णा हजारे यांच्यावर आधारित गीत सादर केले. शुभांगी रायलू यांनी संचालन केले. डॉ. गोपाल बेले यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)भ्रष्टाचारविरोधी लढ्यात स्वार्थी कार्यकर्ते नको ग्राम विकास आणि भ्रष्टाचारविरोधी लढा लढायचा असेल तर कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी, समर्पणाने आणि त्याग करण्याच्या भावनेतून काम करण्याची गरज आहे. तुम्ही निष्कलंक असाल तरच तुमचा प्रभाव पडेल. त्यामुळे या लढ्यामध्ये स्वार्थी कार्यकर्ते नकोत, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.