शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नक्षलग्रस्त जिल्ह्याचा विकास थांबला

By admin | Updated: May 5, 2016 03:03 IST

नक्षलवाद ही देशाला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रालगत असलेले राज्य नक्षलवादामुळे त्रस्त आहे.

नागपूर : नक्षलवाद ही देशाला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रालगत असलेले राज्य नक्षलवादामुळे त्रस्त आहे. नक्षलवादाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. यात आरोग्य, शिक्षण आणि विकासात्मक मूलभूत सोई उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, त्याअंतर्गत अतिरिक्त निधी देण्यात येतो. परंतु गेल्या दीड वर्षापासून निधीच न मिळाल्याने नक्षलग्रस्त जिल्ह्याचा विकास थांबला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी २०१०-११ पासून ‘स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅन’ योजना सुरू करण्यात आली. यात विकासात्मक उपाययोजना करण्यासाठी निधी देण्याचे निश्चित करण्यात आले. सुरवातीला योजनेत महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर २०१२-१३ मध्ये योजनेत बदल करून व्याप्ती वाढविण्यात आली. यात चंद्रपूर व भंडारा या दोन जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. योजनेत नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रती जिल्हा ३० कोटी रुपये देण्यात येते. यातून शिक्षण, आरोग्य, पाणी, बांधकाम, कृषी यासारख्या क्षेत्रावर हा निधी खर्च करण्यात येतो. शासनाच्या निकषाप्रमाणे यातील ७५ टक्के निधी अतिसंवेदनशील भागात खर्च करणे आवश्यक आहे. योजना आयोगात स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅनचा समावेश होता. त्यामुळे निधी व जिल्ह्यांची व्याप्ती वाढविण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने योजना आयोग बरखास्त करून त्या ऐवजी नीती आयोग कार्यान्वित केला. नीती आयोगात नक्षलग्रस्त भागाच्या विकासात्मक उपाययोजनासाठी राबविण्यात आलेल्या स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅनचा समावेश नसल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०१४-१५ ला २० कोटीचा पहिला हप्ता देण्यात आला. नंतर मात्र १० कोटीचा दुसरा हप्ता देण्यात आला नाही. २०१५-१६ मध्ये योजनेचा एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे येथील कामांवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे अतिसंवेदनशील भागातील कामे रखडली आहेत. केंद्र शासन ही योजना गुंडाळणार असल्यामुळे निधी देण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)