शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:30 IST

समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : सीमा सलीमखाँ पठाण यांना सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सीमा सलीमखाँ पठाण यांना शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका डॉ. जुल्फी शेख, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रकाश कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते. डॉ. जुल्फी शेख म्हणाल्या, समाजातील लहान व्यक्तींना पुढे आणून त्यांना संधी देणे हे गिरीश गांधी यांचे महत्त्वाचे काम आहे. सीमाला आकाशाएवढे होण्याची हिंमत त्यांनीच दिली. ज्याच्यात स्फूर्ती आहे, तोच जीवनातील चढ-उतार काव्यातून पकडू शकतो. त्यासाठी गुरूचे अधिष्ठान मानावे लागते. कवितेला समजणे आवश्यक आहे. सुलभा हेर्लेकर यांनी मुक्त रचना केल्या. ज्याच्या हृदयात कळ नाही, पेटून उठण्याचा वणवा नाही तो कविता करूच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, सुलभा हेर्लेकर मोठ्या मनाच्या कवयित्री होत्या. त्यांनी आपल्यासोबतच्या कवयित्रींचे कौतुक तर केलेच, परंतु नवोदितांनाही संधी देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या नावाचा पुरस्कार नवोदित कवींना देण्याचे ठरले. सीमाने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सुलभा हेर्लेकर, जुल्फी शेख यांचा आदर्श पुढे ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांनी प्रतिभावंतांची समाजाने दखल घेण्याची गरज असल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्या कार्याचे कौतुक केले. सीमा पठाणने आपल्या विचारांना शब्दाचे रूप देऊन साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केल्याचे सांगून, तिच्या कामगिरीचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना सीमा पठाण यांनी मोहम्मद असदुल्लाह यांनी हिंमत दिल्यामुळे पुढे येऊ शकल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्यामुळे नवी दिशा मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मो. सलीम शेख यांनी केले. संचालन आणि आभारप्रदर्शन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर