शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

प्रतिभेची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:30 IST

समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : सीमा सलीमखाँ पठाण यांना सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने विदर्भातील ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सीमा सलीमखाँ पठाण यांना शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात डॉ. सुलभा हेर्लेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका डॉ. जुल्फी शेख, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रकाश कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते. डॉ. जुल्फी शेख म्हणाल्या, समाजातील लहान व्यक्तींना पुढे आणून त्यांना संधी देणे हे गिरीश गांधी यांचे महत्त्वाचे काम आहे. सीमाला आकाशाएवढे होण्याची हिंमत त्यांनीच दिली. ज्याच्यात स्फूर्ती आहे, तोच जीवनातील चढ-उतार काव्यातून पकडू शकतो. त्यासाठी गुरूचे अधिष्ठान मानावे लागते. कवितेला समजणे आवश्यक आहे. सुलभा हेर्लेकर यांनी मुक्त रचना केल्या. ज्याच्या हृदयात कळ नाही, पेटून उठण्याचा वणवा नाही तो कविता करूच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, सुलभा हेर्लेकर मोठ्या मनाच्या कवयित्री होत्या. त्यांनी आपल्यासोबतच्या कवयित्रींचे कौतुक तर केलेच, परंतु नवोदितांनाही संधी देण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांच्या नावाचा पुरस्कार नवोदित कवींना देण्याचे ठरले. सीमाने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सुलभा हेर्लेकर, जुल्फी शेख यांचा आदर्श पुढे ठेवून वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांनी प्रतिभावंतांची समाजाने दखल घेण्याची गरज असल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्या कार्याचे कौतुक केले. सीमा पठाणने आपल्या विचारांना शब्दाचे रूप देऊन साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केल्याचे सांगून, तिच्या कामगिरीचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना सीमा पठाण यांनी मोहम्मद असदुल्लाह यांनी हिंमत दिल्यामुळे पुढे येऊ शकल्याचे सांगून, गिरीश गांधी यांच्यामुळे नवी दिशा मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मो. सलीम शेख यांनी केले. संचालन आणि आभारप्रदर्शन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर