शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:44 IST

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

ठळक मुद्देमनसुबे अहिंसेतून उधळा : सीएए, एनआरसी, एनपीआरविषयी संविधान जनजागरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस्ट, सेक्युलॅरिजम अँड डेमोक्रेसी नावाने ६१ संघटनांनी एकत्रित येऊन आयोजित केलेल्या सीएए, एनआरसी आणि एनपीआर यासंबंधातील संविधान जनजागरण सभा मंगळवारी वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडली. त्या प्रसंगी केतकर बोलत होते. अध्यक्षस्थनी युजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात होते. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे आणि जमाते इस्लामी ऑफ हिंदचे अन्वर सिद्धीकी उपस्थित होते.कुमार केतकर पुढे म्हणाले, १९४७ नंतर देशाला पुन्हा दुसऱ्यांदा विभाजनाकडे नेले जात आहे. यामागे हिंदूराष्ट्र निर्मितीचा उद्देश आहे. त्यासाठी सीएएचा आधार घेतला जात आहे. सावरकरांच्या मनोवृत्तीनुसार राज्यघटनेत हिंदू राष्ट्र शब्द आणण्याचा कट देशात रचला जात आहे. ३७० कलमापाठोपाठ सीएए लागू करण्यासाठी सरकारची घाई आहे. काश्मीरच्या मुद्यावर देशात दंगली होतील, अशी अपेक्षा सरकारला होती. मात्र नागरिकांनी ही परिस्थिती संयमाने हाताळली. सीएए लागू करून पुन्हा देशभर दंगे भडकतील, अशी अपेक्षा मोदी-शहा यांना होती. दंगली भडकल्यावर देशात आणीबाणी लागू करून आपले इप्सित साध्य करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांच्या मनातील होऊ देऊ नका. गांधींच्या अहिंसेच्या मार्गानेच उत्तर द्या. सामाजिक एकजूट करा. देशाचे दुसरे विभाजन होऊ देऊ नका.लोकमान्य टिळकांनी वंगभंग चळवळ सुरू केली. त्यातील हिंदू-मुस्लिम एकजूट प्रारंभीच्या काळात सावरकरांनाही मान्य होती. मात्र नंतर त्यांची विचारधारा बदलली, अशी टीका त्यांनी केली.सीएए हा मनुस्मृतीचा उत्तरार्ध असल्याचा आरोप करून केतकर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही ती टिकविण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. तीच विचारसरणी आता धर्माचा आधार घेऊन पुढे येत आहे. स्थलांतरित मुस्लिमांना देशात परत घेणार नाही हे अमित शहांचे संसदेतील विधान हीच सरकारची भूमिका आहे. जगात ५७ मुस्लिम राष्ट्र असून या सर्व राष्ट्रात ३ कोटी हिंदू वास्तव्यास आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठी गंगाजळी देशाला मिळते. असे झाले तर ती राष्ट्रेही भारतीय हिंदूंना देशाबाहेर काढतील. गंगाजळी बुडेल, याचा विचार करण्याची गरज आहे.सुखदेव थोरात म्हणाले, मुस्लिम धर्मियांना नागरिकत्व न देणे ही सीएएची भूमिका भेदभावपूर्ण आहे. त्यामागे राजकीय हेतू आहे. यापूर्वी धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याचा प्रकार कधीच घडला नाही. हे प्रथमच घडत असल्याने घटनात्मक तरतुदीचे उल्लंंघन आहे. नागरिकांना भ्रमित करून हिंदुझमच्या नावाखाली ब्राह्मणवाद थोपविण्याचा प्रयत्न याआड होत आहे. ब्राह्मणवादाचा शिकार झालेले दलित मुस्लिम,ओबीसी हिंदूही त्यांना साथ देतात, अशी टीका त्यांनी केली. प्रफुल्ल गुडधे आणि अन्वर सिद्धीकी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संविधान प्रास्ताविका वाचन झाले. विद्यार्थ्यांनी गीते सादर केली. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकnagpurनागपूर