शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी उपसंचालक नरड, नाईक सायबर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:30 IST

दोन दिवस होणार चौकशी : आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्यात मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक उल्हास नरड तसेच वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. मुख्याध्यापक बोगस मान्यता प्रकरणात हे दोघेही कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची दोन दिवस कसून चौकशी करण्यात येणार आहे व त्यातून शालार्थ प्रणालीतील गैरप्रकारातीन मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे शालार्थ आयडी घोटाळ्याची तक्रार केली. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी उपसंचालक कार्यालयाने २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. यातील ३१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 'शालार्थ आयडीं'ना उपसंचालक कार्यालयाने मान्यता दिली होती. 

उर्वरित 'शालार्थ आयडी'ची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते. नरड यांनाच अपात्र मुख्याध्यापकाचा 'शालार्थ आयडी' तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांना नरड व नाईक यांचा ताबा हवा होता. पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर दोघांनाही ताब्यात घेतले.

पासवर्डचा गैरवापर झालाच कसा?सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार झाली होती. 'शालार्थ आयडी' निर्माण करण्याचा अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याने गैरवापर करून 'शालार्थ आयडी' तयार केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. मात्र, नरडच्या पासवर्डचा त्यांच्या माहितीशिवाय गैरवापर झालाच कसा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या दिशेने सविस्तर चौकशी करणार आहेत.

२४४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी होणार

  • दरम्यान उल्हास नरड यांना अटक झाल्यानंतर शिक्षण विभागात पूर्वीपासून सुरू घोळाची प्रकरणे बाहेर येत आहेत. नरड पदावर आल्यानंतर पूर्वीच्या उपसंचालक वैशाली जामदार यांच्या काळात झालेल्या अशा प्रकरणांच्या तक्रारी झाल्या व त्या प्रकरणांची चौकशी नरड यांच्याकडे आली होती.
  • यामध्ये जिल्ह्यातील २० हून अधिक शाळांमध्ये २११ शिक्षक, २ मुख्याध्यापक आणि ३१ लिपिकांच्या नियुक्तीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत होते. नरड यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांना ३ मार्च २०२५ रोजी पत्र पाठवित या २४४ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सादर करण्यात आलेली वैयक्तिक मान्यतेची मूळ नस्ती, शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याकरिता शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या दुय्यम शालार्थ प्रस्तावाची प्रत, जावक नोंदवहीची प्रत आणि उपसंचालक कार्यालयाने निर्गमित केलेल्या शालार्थ आदेशाची मूळ प्रत तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. या २४४ कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांची पुन्हा चौकशी होणार का, हा प्रश्न विचारला जात आहे.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण