शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

पोलिसांच्या एसआयटीचे विकेंद्रीकरण, भूमाफियांची प्रकरणे हाताळणार पोलीस उपायुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 22:32 IST

माफिया दिलीप ग्वालबन्सी याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संबंधाने प्रभावीपणे तपास करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विकेेंद्रीकरण करण्यात आले आहे.

 नागपूर - भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संबंधाने प्रभावीपणे तपास करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) विकेेंद्रीकरण करण्यात आले आहे. अवघ्या सहा महिन्यात एसआयटीकडे आलेल्या १६७० तक्रारींपैकी ७०० तक्रारींचा निपटारा केला असून, ६८४ पीडितांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिल्याचा दावा एसआयटीच्या कामकाजाची माहिती देताना गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसआयटीचे सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते.

भूमाफिया ग्वालबन्सीच्या पापाची तक्रार मिळाल्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी २७ एप्रिल २०१७ ला एसआयटीची स्थापना केली. सहपोलीस आयुक्तांच्या देखरेखीत गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली एसआयटीचे कामकाज सुरू होते. तपास पथकाकडे अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तक्रारी आल्या. एकूण ३५ मोठ्या प्रकरणांपैकी १७ प्रकरणं एकट्या ग्वालबन्सी कंपूविरुद्ध होती. एका प्रकरणात पोलिसांनी दिलीप आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आणि दुसºया एका प्रकरणात पोलिसांनी कुख्यात जर्मन-जापान गुंडांच्या टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई केली. तातडीने न्याय मिळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे एसआयटीकडे तक्रार करणारांची वर्दळ वाढली. अवघ्या सहा महिन्यात तब्बल १६७० तक्रारी एसआयटीला मिळाल्याने तपासाच्या गतीवर फरक पडला. दरम्यान, आता मोठ्या गुन्ह्यांच्या तक्रारीची संख्या रोडावल्यामुळे आणि प्रलंबित प्रकरणाच्या तपासाला गती मिळावी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी एसआयटीचे विक्रेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत अधिकाºयांना हा निर्णय कळविण्यात आला. 

 उपायुक्त ठेवणार लक्ष प्रलंबित  ९२३ तक्रार अर्ज एसआयटीकडून त्या त्या परिमंडळातील पोलीस उपायुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यातून या प्रकरणाची चौकशी होणार असून, ठाण्यातील मंडळींनी गडबड करू नये म्हणून त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त या प्रकरणाच्या चौकशीवर लक्ष ठेवणार आहेत. मात्र, ज्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले, अशा सर्वच प्रकरणाच्या तपासाची, दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी एसआयटीतील अधिका-यांचीच राहणार असल्याचे यावेळी  स्पष्ट करण्यात आले. अनेकांना लाभ, राजकीय दडपण नाही

 एसआयटीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आक्रमक कारवाईचा पवित्रा घेत १८२ एकर जमिन आणि १ कोटी, ९२ लाख, ८० हजारांची भरपाई पीडितांना मिळवून दिली आहे. एकट्या ग्वालबन्सी कंपूकडून ९८ एकर जमिन ताब्यात घेण्यात आल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले.   

अनेक प्रकरणात गुन्हेगारांसोबत काही नेतेही गुंतले आहेत. त्यांच्या दबावामुळे एसआयटीचे विकेंद्रीकरण करण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित झाला असता कदम यांनी तो फेटाळून लावला. कुणाचा अन् कसल्याची प्रकारचा पोलिसांवर दबाव नसल्याचे ते म्हणाले. अधिक जलदगतीने प्रकरणाचा तपास व्हावा, म्हणून विकेंद्रीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अप्पू वाधवानी, जगदीश ग्वालबन्सी यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केलेली नाही, याकडे एका पत्रकाराने लक्ष वेधले असता योग्य ती कारवाई सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.  

शासकीय यंत्रणांचे सहकार्य नाही

निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख, महापालिका, नासुप्र आदी कार्यालयात भूमाफियांशी संबंधित प्रकरणांचा तपास आहे. त्यामुळे या कार्यालयांना वारंवार पत्र लिहून माहिती मागण्यात आली. मात्र, पाच महिन्यात अनेक कार्यालयातील अधिका-यांकडून पोलिसांना माहिती पुरविण्यात आली नाही. त्यांच्या या असहकार्यामागे काय आहे, असा प्रश्न केला असता त्याचीही चौकशी केली जात असल्याचे कदम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत मुन्ना यादव प्रकरण, रामदासपेठेतील हॉटेलमधील तसेच शहरातील अन्य ठिकाणच्या जुगार अड्डयावर झालेली संशयास्पद कारवाई, कामठीच्या मुलाचे अपहरण यासह विविध प्रकरणाच्या संबंधाने पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर उपायुक्त कदम यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. यावेळी एसआयटीत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक ललित वर्टीकर, सहायक निरीक्षक प्रमोद घोंगे, किरण रासकर, विनायक पाटील, गजेंद्र राऊत, प्रशांत जुमडे, देवीदास चोपडे आणि पोलीस उपनिरीक्षक स्रेहल राऊत उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस